भीजपावसाने तरारली पिके, पण अतिपावसाने पिवळी पडण्याचीही भिती

Agriculture
Agriculture

औरंगाबाद: आठवडाभरात रिमझिम पाऊस वगळता पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती. या विश्रांतीनंतर सोमवारी दिवसभर तसेच सायंकाळी आणि मंगळवारी दुपारनंतर जिल्हाभरात भीजपाऊस झाला. चार पाच दिवसातील या भीजपावसामुळे खरीपातील पिकेही चांगलीच तरारली असून जिल्ह्यात आल्हाददायक वातारवरण आहे. 

श्रावणात पावसाच्या सरीमागून सरी कोसळत असल्याने शहरवासीयांनीही पावसाचा आनंद घेतला. गोकुळाष्टमीच्या पुर्वसंध्येला पावसाने शिडकावा केल्याने चैतन्याचे वातावरण आहे. मंगळवारीही जिल्हाभरात अनेक ठिकाणी भीज पाऊस झाला. दरम्यान, चिकलठाणा वेधशाळेने रात्रीच्या पावसाची नोंद ३१.६ मिलीमीटर झाली होती. 

सर्वच नक्षत्रात बरसतोय वरुणराजा 
मृग नक्षत्रात ऐन पेरणीच्या वेळेतच चांगला पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण होते. तेव्हापासून आजवर सर्वच नक्षत्रात पावसाची बरसात झाली आहे. जायकवाडी धरणात ५४ टक्के पाणीसाठा झाला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शहर आणि जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. सध्या अश्लेषा नक्षत्र सुरू असून, सर्वच नक्षत्रात एकसारखा सुरू असलेला जास्त पाऊस खरीप पिकांसाठी हानीकारक ठरण्याची शक्यता शेतीतज्ज्ञांनी वर्तविली आहे. 

पिके पिवळी पडण्याची भीती 
जिल्ह्यात जुलैच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, मका, मिरची आदी पिकांना धोका निर्माण झाला असून त्यावर शिफारशीनुसार फवारणी घेण्याचे आवाहन कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

मिरची पिकांवर कोकडा रोगाचा प्रादूर्भाव झाला असून यामुळे झाडांची वाढ खुंटते. या रोगाच्या नियंत्रणासाठी नीम ऑईल ७० टक्के दोन चमचे प्रति चार लिटर पाण्यात मिसळून फवारावे. शेतात पिवळे व निळे चिकट सापळे लावण्याचे आवाहन किटकशास्त्रज्ञ डॉ. गजेंद्र जगताप यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com