संशय ‘सारी’चा, निघाले २५ जण कोरोनाबाधित 

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : कोरोनापाठोपाठ शहरात सारीचे (सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्परेटरी इलनेस) रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली होती. या आजाराने तब्बल १६ जणांचे बळी देखील घेतले.

सारी व कोरोना रुग्णांची लक्षणे सारखीच असल्यामुळे सारीच्या प्रत्येक रुग्णाचा स्वॅब घेऊन कोरोना चाचणीही केली जात आहे. आत्तापर्यंत ‘सारी’चे ३५५ रूग्ण शहरात आढळले. त्यापैकी ३४२ रुग्णांचे स्वॅब तपासण्यात आले असून, २५ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. 

शहरात मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या. सुरुवातीला एक-दोन रुग्ण आढळून आल्यामुळे प्रशासनही निश्‍चिंत होते. मात्र, दरम्यानच्या काळात ‘सारी’ या आजाराने डोके वर काढले. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सारीच्या आजाराने खासगी रुग्णालयात नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्ण झपाट्याने वाढले.

कोरोना आणि सारीच्या आजाराची लक्षणे सारखीच असल्याने सारीच्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यात २५ रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे समोर आले आहे. दरम्यान सारीने १६ जणांचा बळीही घेतला आहे. गेल्या महिनाभरात सारीच्या आजाराचे रुग्ण घटले होते आता पुन्हा सारीच्या आजाराचे रुग्ण सापडत आहेत.

पुन्हा पाच रुग्ण आढळले

शहर, जिल्हा व मराठवाड्याच्या विविध भागात मंगळवारपर्यंत (ता. २६) सारीचे एकूण ३५५ रूग्ण आढळून आले. त्यात नव्या पाच रुग्णांचा समावेश आहे. यापैकी ३४२ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यात ३०८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून नऊ जणांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. सारीचे पुन्हा एकदा रुग्ण आढळून येत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com