औरंगाबाद : आमदार अंबादास दानवे
औरंगाबाद : आमदार अंबादास दानवे

बेपत्ता महिलांचा शोध न लागल्याने वाढल्या अत्याचाराच्या घटना 

औरंगाबाद - राज्यातील विविध भागांतून बेपत्ता झालेल्या महिलांचा शोध लावण्यात पोलिस खात्याला यश न आल्यामुळेच अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, यासंदर्भात गृहविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत केली. 

‘महिलांवरील वाढते अत्याचार’ या विषयावरील चर्चेत सहभागी होताना आमदार दानवे यांनी सभागृहाचे लक्ष एका महत्त्वाच्या मुद्याकडे वेधले. ते म्हणाले, की राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमागील अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे बेपत्ता महिलांचा शोध न लागणे.

 राज्याच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदविल्या जातात; पण त्याचा तपास योग्य पद्धतीने केला जात नाही. 

वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत १०० ते १२५ महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत; परंतु यापैकी एकाही महिलेचा शोध पोलिसांना लावता आलेला नाही. 
महिने, वर्ष उलटून जातात तरी बेपत्ता महिलांचा तपास लागत नाही आणि यातूनच पुढे कुठे तरी महिलेवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर येतात. सरकार यासंदर्भात ठोस कारवाई करणार का? असा सवाल देखील अंबादास दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला. 

श्री. दानवे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात देखील मुली आणि महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्‍थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बेपत्ता महिलांचा शोध घेऊन तपास पूर्ण करण्यासाठी शासन निश्चितच गंभीर असून, या कामात आणखी गती आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

सातारा-देवळाईसाठी ४०० कोटी निधी द्यावा 

सातारा-देवळाई भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, यासाठी ४०० कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातारा-देवळाईसंदर्भात लक्षवेधीत केली. 

या भागामध्ये नागरिकांची मोठी वसाहत असल्यामुळे विकासकामे करणे गरजेचे आहे. रस्ते, पाणी, भूमिगत गटार, पथदिवे आदी सुविधांचा अभाव असल्याचे नागरिकांना गैरसोय होत आहे. सातारा भागामध्ये ऐतिहासिक खंडोबा मंदिर असून या ठिकाणी दर्शनासाठी शहरातील व बाहेरिल नागरिक येत असतात, असे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रश्नावर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासकामांसाठी निधी देण्याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com