घरासाठी थापाव्या लागल्या बेघरांना जिल्हाधिकारी कार्यालयापुढे भाकरी

युवा आंदोलन.jpg
युवा आंदोलन.jpg

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने अतिक्रमण काढून बेघर केले. आता आम्हाला घर नाही बेघर करणाऱ्या महापालिका प्रशासनाने आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करत बुधवारी (ता.३०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिऱ्हाड आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी आंदोलनस्थळी दगडाची चुल मांडून तिथे भाकरी थापत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
जय भवानीनगरातील शिवाजी महाराजांचा पुतळा ते मुकूंदवाडी रेल्वेस्टेशन या रस्त्यावर गेल्या २५ वर्षांपासून लोक राहत होते. येथील लोकांनी रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाप्रमुख जयकिशन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली बिऱ्हाड आंदोलन केले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेकडून सर्वे करून आमची घरे रूंदीकरणात येत असल्याचे तोंडीच सांगीतले. कोणतीही नोटीस न देता, सेंटर पॉईंट न काढता आम्हाला ३१ जुलै २०१५ रोजी बेघर करण्यात आल्याचा महापालिका प्रशासनावर आरोप करण्यात आला.

गेल्या पाच वर्षांपासून आम्हाला रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी स्तरावर एक समिती तयार करून जय भवानीनगरातील जी घरे पाडण्यात आली आहेत त्याचा सर्वे करून बाधित कुटूंबांचे पुनर्वसन करण्यात यावे किंवा योग्य तो मोबदला देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. बिऱ्हाड आंदोलनात अनिल गवळे, गणेश काकडे, सुरज खाजेकर, बाबुराव गोंड, मारूती मंदुमले, शेख फय्याज, बंडू मोरे आदी सहभागी झाले होते.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com