भाजपच्या राष्ट्रीय सचिवांचे मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र, म्हणाल्या गुन्हेगारांना जरब बसवा   

vijay rahatkar.jpg
vijay rahatkar.jpg

औरंगाबाद : हाथरससारख्या घटनांची पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. पण महाराष्ट्रातील महिला अत्याचारांचे वास्तव आणि वस्तुस्थिती भीषण आहे. त्याबाबत कठोर कारवाई करण्याची इच्छाशक्ती सरकार दाखवत नसल्याची टीका भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी केली आहे.

मुख्यमंत्री व राष्ट्रीय महिला आयोगाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी महाराष्ट्रात घडलेल्या महिला अत्याचारांच्या २५ निवडक घटनांची माहिती देखील दिली आहे. 

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा असलेल्या रहाटकर यांनी ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात सरकारचे महिला सुरक्षेच्या अनेक मुद्द्यांवर लक्ष वेधले आहे. गेल्या काही महिन्यात राज्याच्या विविध भागात घडलेल्या महिला अत्याचाराच्या २५ निवडक घटना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत श्रीमती रहाटकर यांनी म्हटले आहे की, आपण हाथरसमधील घटनेबाबत चिंता व्यक्त केली; पण राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरोच्या अहवालानुसार, २०१९मध्ये महाराष्ट्रात हाथरससारख्या तब्बल ४७ घटना घडल्या आहेत.

अशा घटनांमध्ये देशात पहिल्या क्रमांकांवर असण्याची नामुष्की महाराष्ट्रावर ओढवली आहे. बलात्कार आणि महिला अत्याचारांच्या अन्य घटनांची संख्याही महाराष्ट्रात असल्याची माहिती ‘एनसीआरबी’च्या अहवालातून मिळते. अशावेळी गुन्हेगारांना जरब बसेल, अशी पावले सरकारने, पोलिसांनी उचलली पाहिजेत अशी मागणी केली. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com