लॉकडाऊन शिथिल... सहा तास सुरू राहणार किराणा दुकाने 

Corona News Aurangabad
Corona News Aurangabad

औरंगाबाद : कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शहरात गुरुवारपासून (ता. १४) लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात होती. बुधवारी (ता. २०) कडक लॉकडाऊनची मुदत संपत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी नवे आदेश काढले असून, गुरुवारपासून (ता. २१) ते ३१ मेपर्यंत लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सहा तासांसाठी खुली राहतील. सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत अन्नधान्य, किराणा, भाजीपाला, फळे, दूध नागरिकांना खरेदी करता येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

कोरोनाबाधितांची संख्या शहरात एक हजाराच्यापेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. म्हणून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १४ मेच्या मध्यरात्रीपासून ते २० मेच्या मध्यरात्रीपर्यंत शहरात लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहा दिवस लागतात. त्यामुळे सहा दिवसांच्या या कडक लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या आटोक्यात येईल, असा विश्‍वास प्रशासनाने व्यक्त केला होता. बुधवारी कडक लॉकडाऊनची मुदत संपत आहे.

या पार्श्‍वभूमीवर अस्तिककुमार पांडेय यांनी केंद्र शासनाच्या नव्या सूचनेनुसार आदेश काढले आहेत. २१ ते ३१ मेपर्यंत केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या आस्थापना खुल्या ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत अन्नधान्य, भाजीपाला, फळे, किराणा साहित्य विक्री करणारे दुकाने उघडी राहतील. तसेच हातगाड्यांनाही परवागनी राहील. पण सुरक्षित अंतर, सॅनिटायझर व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. गर्दी होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. बाजारपेठांच्या ठिकाणी रोजची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच मेडिकल स्टोअर्स, औषध निर्मितीचे उद्योग या आस्थापनांची परवानगी कायम आहे, असेही आस्तिककुमार पांडेय यांनी आदेशात नमूद केले आहे. 

या नियमांचे पालन करणे आवश्यक 
बाजारपेठांच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. 
सोशल डिस्टन्सिंग राखला जाईल, याची काळजी घ्यावी. 
हातगाडीचालकांनी तोंडाला मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. 
दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे आवश्यक आहे. 
आस्थापनांनी परिसरात रोजची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com