आजोबांना कॉल केला; पण ते येईपर्यंत संस्कार गेला 

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : आजोबा घरात आग लागलीय.. लवकर या.. असे उद्गार नातवाने काढून आजोबांना आगीच्या भीषण घटनेची माहिती दिली; पण शिवाजीनगरहून आजोबा आले तेव्हा चौदावर्षीय संस्कार कायमचाच जग सोडून गेला होता.

जाधव कुटुंबीयांसोबत पहाटेच्या साखरझोपेच्यावेळी मोठा अनर्थ घडला आणि त्यांचा लाडका संस्कार हिरावला गेला. कुटुंबावर बेतलेला प्रकार आणि संस्कारच्या मृत्यूने उल्कानगरीत हळहळ व्यक्त होत आहे.

उल्कानगरी परिसरात खिंवसरा पार्क येथील ग्राउंड फ्लोअरवरील रो-हाऊसमध्ये आग लागून वरच्या मजल्यावरील कुटुंब धुराने गुदमरून अत्यवस्थ झाले. यात १४ वर्षीय मुलाचा गुदमरल्याने मृत्यू झाला. कुटुंबातील तिघांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना गुरुवारी (ता. २७) पहाटे पावणेपाचच्या सुमारास घडली. 

अंदाजित २००० हजार स्क्वेअर फुटांच्या प्लॉटमध्ये रो-हाऊस आहे. आग लागली तेव्हा १४ वर्षीय संस्कारने त्याच्या आईकडील आजोबा एस. डी. शिंदे यांना संपर्क केला होता. विशेष म्हणजे संस्कारचे वडील श्‍यामसुंदर यांनीही त्यांना संपर्क केला होता, अशी माहिती सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांनी दिली. याबाबत प्रत्यक्षदर्शी व शेजारील अथर्व बुंड यांनी पाहिलेला प्रकार त्यांच्याच शब्दांत... 

‘‘‌पहाटे साडेचारनंतर जाधव यांच्या घरातून ओरडण्याचा आवाज येत होता. हा आवाज ऐकूनच जाग आली. खिडकीतून पाहिले तेव्हा जाधव यांच्या घरात मोठा धूर होता व ग्राउंड फ्लोवरला आग लागली होती. माझ्या घराच्या मागेच त्यांच्या घराची भिंत आहे. त्यामुळे मी अग्निशमन दलाला संपर्क केला. काही वेळाने जाधव यांच्या घरातून आवाज येणे बंद झाले. आम्ही स्थानिकांनी सीडी लावून त्यांच्या मदतीचे प्रयत्न सुरू केले. 

ही माहिती आली समोर

  • जाधव राहत असलेले घर अर्थात रो-हाऊस आहे. आतूनच वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे. या जिन्यातही विद्युत साहित्य ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे जाता-येता तिरपे होऊन जावे लागत होते. 
  • ग्राउंडफ्लोअरवरील खोल्यात आग लागली तेव्हा जिन्याण्यामार्गे वरच्या मजल्यावर मोठा धूर येणे सुरू झाले. धूर एवढा जास्त होता की डोळ्यासमोर काहीच दिसत नव्हते. 
  • आगीमुळे सर्व खोल्या तप्त झाल्या. वरच्या मजल्यावरची गच्चीही तापली होती. पाय ठेवणेही अवघड झाले होते. गच्ची उष्ण असल्याने जाधव कुटुंबीयांचे पायही पोळत होते आणि डोळ्यासमोर काही दिसत नव्हते, त्यामुळे त्यांना हालचाल करणे शक्य झाले नसावे. परिणामी त्यांना खिडकी आणि दार उघडता आले नसावे, अशी माहिती समोर आली आहे. 
  • आग लागली तेव्हा लाईटही खंडित झाली आणि पहाटेची वेळ होती. परिणामी खोल्यात अंधार होता आणि हे कारणही खिडकी न उघडण्यास पुरेसे होते अशी माहिती पुढे येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com