औरंगाबाद : गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली हॉटेल्स, बार सोमवारपासून (ता.५) सुरू झाले. पहिल्याच दिवशी शहरातील काही हॉटेल्समध्ये गर्दी तर काही ठिकाणी जेमतेम ग्राहक आले. सहा महिन्यानंतर हॉटेल्स, बार चालकांनी ग्राहकांचे स्वागत करीत व्यवसायाला सुरुवात केली. यात ऑक्सीमीटर, टेम्पेचर मशीन, सॅनिटाझरचा वापर करीत ग्राहकांना प्रवेश दिला. हॉटेलात काम करणाऱ्या कामगारांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत सेवा दिली. पहिल्या दिवशी समिश्र प्रतिसाद मिळाल्याचे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी मनगटे यांनी सांगितले.
शहर व जिल्ह्यातील साडेतीनशेहून अधिक हॉटेल्स सहा महिन्यानंतर सुरु झाल्या. त्यापूर्वी त्यांना केवळ पार्सल सुविधा देण्याची परवानगी होती. त्यामुळे ग्राहकांना हॉटेलात बसून जेवण करता येत नव्हते. परवानगी मिळल्यामुळे हॉटेलात व बारमध्ये बसण्याचा आनंद ग्राहक घेत आहेत. मात्र, हॉटेल, बारसाठी सायंकाळी सातपर्यंत वेळ देण्यात आली असल्याने अनेकांचा हिरमोड होत आहेत. यामुळे ही वेळ वाढवून देण्याची मागणी हॉटेल व्यवसायिकांकडून करण्यात आली.
पहिल्या दिवशी ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. हॉटेल व बारसाठी सात वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. तो वाढवून देण्यात यावी यासाठी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. यासह महापालिका प्रशासनासही वेळ वाढवून देण्याची मागणी करणार आहेत.
- शिवाजी मनगटे, अध्यक्ष, हॉटेल असोसिएशन औरंगाबाद.
Edited - Ganesh Pitekar
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.