औरंगाबाद : महाराष्ट्रात कोणत्याही व्यक्तीची ओळख ही त्यांच्या आडनावावरून पटते. यातून त्या व्यक्तीची, कुटुंबाची अचूक ओळख पटते. सर्रासपणे सर्वभागात आढळणारी आडनावे तर आहेतच याशिवाय ऐकायला कशीतरी वाटणारीही आडनावे आहेत. कारण या आडनावांवर, प्राकृतिक, भौगोलिक, नैसर्गिक घटकांचा, मानवी स्वभावांचा, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक घटकांचा प्रभाव पाहायला मिळतो आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
आडनाव म्हणजे उपनाम किंवा कुटुंबाची ओळख आहे. आडनावे कशी पडली असावीत याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. मदन सूर्यवंशी म्हणाले, एकच नाव धारण करणाऱ्या अनेक व्यक्तींची अचूक ओळख पटवण्यासाठी आडनावे तयार झाली असावीत. आडनावांवर भौगोलिक घटक, सांस्कृतिक घटकांचा, त्यांच्या स्वभावांचा, व्यवसायांचा प्रभाव आहे. त्यावरून त्यांची आडनावे तयार झाली आहेत. हीच पुढे त्या कुटुंबांची ओळख निर्माण झाली. काही आडनावे अलीकडच्या काळात काही लोकांना आवडत नसल्याने त्यात बदल करून घेतला जात आहे. भौगोलिक घटक, पर्यावरण, नैसर्गिक साधन संपत्ती, जैवविविधतेचा त्या आडनावावर प्रभाव जाणवतो.
महाराष्ट्रातील काही आडनावांचे उदाहरणे
भूगोल विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. केशव उके यांनी या आडनावांविषयी अभ्यास केला आहे. त्यात त्यांनी दिलेल्या काही आडनावांची उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत.
(संपादन-प्रताप अवचार)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.