CoronaVirus : सामाजिक अंतर हा तर स्थायीभाव : पण कुठे?

photo
photo

औरंगाबाद, : सिंगापूरमध्ये लोक शिस्तप्रिय असल्याने कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. येथे लोक स्वतःहून घरात राहत आहेत. सामाजिक अंतर ठेवणे हा येथील लोकांचा स्थायीभाव आहे. त्यामुळे त्यांना अवघडल्यासारखे वाटत नाही. भारतीयांना एकमेकांपासून दुर राहण्याचा प्रकार अवघडल्यासारखा वाटणे स्वभाविक आहे, मात्र आता पर्याय नाही. कोरोनाचा सामाजिक संसर्ग टाळण्यासाठी हे करावेच लागेल असा सल्ला औरंगाबादचे रहिवाशी आणि सिंगापुरला वास्तव्यास असणारे आशिष व प्राजक्ता खोब्रागडे या दाम्पत्याने.   
 
आरोग्याबद्दल जागृत देश 

आशिष खोब्रागडे यांनी सागीतले की, मी ऐमटेक रिसर्च ईंजीनीयर मागील ५ वर्षा एका मल्टी नॅशनल मीडिया कंपनी मध्ये डिरेक्टर ह्या पदावर सिंगापूर मध्ये कार्यरत आहे. मी आणि माझी पत्नी प्राजक्ता कांबळे (खोब्रागडे) आम्ही दोघेही सिंगापुरमध्ये वास्तव्यास आहे. 
सिंगापूर हा देश जागतिक व्यवसायीक आणि पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. येथे जगातील अग्रगण्य विमानतळ आणि शिपींग बंदर असल्याने येथे विविध देशांतील लोक एकत्र येतात. सिंगापूर हे आरोग्याबद्दल जागृत देश म्हणून ओळखला जातो. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पहिला रुग्ण जानेवारीत

सिंगापूर येथे कोरोना व्हायरसची पहिली केस जानेवारी 2020 ला आढळून आली. यापूर्वी सार्स या आजाराचा अनुभव सिंगापूरला होता त्यामुळे देशभरात सामाजिक अंतर प्रवास वाहतूक आणि इतर देशातून येणारे पर्यटक आणि देशातील नागरिक यांची कडक तपासणी सुरू झाली विमानतळ, बस आधी प्रवाशांची चाचणी शिवाय सिंगापूरमध्ये प्रवेश नव्हता आणि भविष्यात आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ नये अशी खबरदारी शासनाने घेतली. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

परिस्थिती आटोक्यातच

आरोग्यसुविधा वाढविण्यास सुरुवात केली आणि सार्वजनिक स्थळे, धार्मिक स्थळे बंद केली. सर्व देशातील रहिवासी आणि बाहेरुन आलेले यांच्यात चाचण्या सुरू झाल्या. सध्या येथे कोरोनाचे ६ हजार ५८८ रुग्ण आहेत. ११ लोकाचा मृत्यु झाला आहे. आणि ७४० रुग्ण बरे झालेले आहे. फेब्रुवारी 2020 पासून सर्व कंपन्यांना वर्क फ्रॉम होम सूरू केले. येथे शासनाचे निर्देश शंभर टक्के पाळले जातात. सामाजिक आंतर ठेवणे, मास्क वापरणे याचबरोबर नियमांचे काटेकोर पालन करणे हे सिंगापूर जनतेचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच कोरोनाची स्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

भारताचे प्रयत्न चांगलेच

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला 3-T प्रोग्राम (ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट) अभिनंदनीय आहे. या कार्यक्रमामुळे रुग्णसंख्या जरी वाढलेली दिसत असली तरी खरे वास्तववादी परिस्थितीस आपणास लढा देता येतो व वास्तववादी नियोजन करता येते. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. अत्यंत अभ्यासपूर्ण केलेले हे नियोजन आहे. त्याचे काटेकोरपणे पालन करणे ही जनतेची जबाबदारी आहे. त्यामुळे जनतेने संयमाने व महाराष्ट्र सरकारवर विश्वास ठेवून राहावे व सर्व काही चांगले होईल काळजी करू नये आणि घाबरून जाऊ नये. फक्त शासन आदेश पहा आणि ते पाळा सकस आहार घ्या शक्तिवर्धक रहा, घरातल्या घरात वातावरण उत्साहवर्धक ठेवा आणि ताणतणावातून मुक्त व्हा. कोणत्याही परिस्थितीत भारतात सामाजिक संसर्ग होऊ न देणे पूर्ण जनतेच्या हातात आहे. सगळं शासनाने करावं असं नाही जबाबदारी नागरिकांची आहे, त्याचे भान ठेवा. 
  

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com