महापालिका आयुक्तांनी का लावला कंपनीला दंड

amc aurangabad
amc aurangabad

औरंगाबाद- बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मंगळवारी (ता.21) थेट महापौरांच्या वॉर्डात धडक दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी (ता.22) आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शहरात अनेकांना दंड लावत दणका दिला. आच्छादन न करता बांधकाम करणाऱ्या दोघांना प्रत्येक पाच हजार तर मिक्‍स कचरा जमा करणाऱ्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीला देखील पाच हजारांचा दंड आयुक्तांच्या आदेशानुसार लावण्यात आला. 

आयुक्त पांडेय यांनी बुधवारी सिंधी कॉलनी, बालाजीनगर, शिवशंकर कॉलनी, बौद्धनगर, क्रांती चौक, रमानगर या वॉर्डांत काही ठिकाणी भेटी दिल्या. मोंढा चौकातून आयुक्तांची पाहणी सुरू झाली. त्यांनी उड्डाणपुलाखाली तयार करण्यात आलेले सुशोभीकरणाचे काम पाहून समाधान व्यक्त केले. त्यानंतर ते सिंधी कॉलनीत पोचले. याठिकाणी दोन इमारतींचे बांधकाम सुरू होते; मात्र संरक्षण जाळी व प्रदूषण रोखण्यासाठी आच्छादन लावलेले नव्हते.

बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकण्यात आले होते. त्यामुळे आयुक्तांनी दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. मालमत्ताधारक सुनील प्रताप यांच्यासह अन्य एकाकडून पाच हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. पुढे बालाजीनगरात एका दुकानासमोर ओला व सुक्‍या कचऱ्यासाठी स्वतंत्र डस्टबिन ठेवण्यात आले नसल्याचे समोर आले. आयुक्तांनी एका मिठाईच्या दुकानदाराकडे विचारणा केली असता, त्याने माझ्याकडे ओला कचरा नसतोच असे उत्तर दिले. या दुकानदारांना दोन डस्टबिनसंदर्भात सूचना केल्या नाहीत का? अशी विचारणा आयुक्तांनी अधिकाऱ्यांकडे केली. अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, असे सांगितल्यानंतर आयुक्तांनी या दुकानदारांकडून प्रत्येकी 500 रुपये दंड वसूल करण्याचे आदेश दिले.

आयुक्तांसोबत नगरसेवक नितीन साळवी, शिल्पाराणी वाडकर, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपायुक्त रवींद्र निकम, उपअभियंता ए. बी. देशमुख, सहायक आयुक्त करणकुमार चव्हाण, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे, नगररचना विभागाचे सहायक संचालक एस. आर. महाजन, के. डी. देशमुख, वॉर्ड अधिकारी संपत जरारे यांच्यासह अधिकारी उपस्थिती होते. 

आयुक्तांनीच पकडला मिक्‍स कचरा 
महापालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीला कचऱ्याच्या वजनावर पैसे दिले जातात. कचऱ्याचे वजन वाढावे म्हणून कंपनीतर्फे कचऱ्यात दगड, माती, विटा टाकल्या जात असल्याचा आरोप नगरसेवकांतर्फे केला जात आहे. दरम्यान, आज आयुक्त पाहणी करत असताना कंपनीची कचऱ्याने भरलेली रिक्षा आयुक्तांसमोरून जात होती. आयुक्तांनी रिक्षा थांबविण्याची सूचना केली. रिक्षात ओल्या व सुक्‍या कचऱ्याचे वेगवेगळे भाग न करता तो एकत्र टाकण्यात आला होता. हा प्रकार पाहून आयुक्त संतप्त झाले. संबंधित पर्यवेक्षकाला आधी दंड करा, त्याच्या पगारातून दंडाची रक्कम कपात करावी, अशी सूचना आयुक्तांनी केली. नंतर हा दंड मात्र कंपनीकडून वसूल करण्यात आला. 

हेही वाचा - पथक आले पण कोणी नाही पाहिले
 
स्मशानभूमीत शेवट, कामे चांगली करा 
आयुक्तांनी नंतर रमानगर स्मशानभूमीची पाहणी केली. यावेळी नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी समस्या मांडल्या. प्रत्येकाचा शेवट इथेच होणार आहे. त्यामुळे चांगली कामे करा, असे आयुक्त अधिकाऱ्यांना उद्देशून यावेळी म्हणाले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com