शैक्षणिक धोरण - कही खुशी कही गम : डॉ. उल्हास उढाण 

dr ulhas udhan.jpg
dr ulhas udhan.jpg

औरंगाबाद : नवीन शैक्षणिक धोरणाचा आराखडा जाहीर झाला आहे. हा आराखडा असून कायदा नाही. त्यामुळे यातील कोणत्या गोष्टी लागू करावयाच्या आणि कोणत्या नाही, हे शेवटी सरकारच्याच हातात राहणार आहे. आराखडा पाहता कही खुशी कही गम अशी परिस्थिती असल्याचे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक डॉ. उल्हास उढाण यांनी सांगितले. 

डॉ. उढाण म्हणाले, जुना पॅटर्न बदलून आता ५+३+३+४ हा नवा पॅटर्न आणून दहावी आणि बारावी बोर्डाचे महत्व कमी करत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणला मूठमाती देण्यात आली आहे. शिक्षणाचा अधिकार याचा अधिक विस्तार करण्याची तरतूद या धोरणात केलेली दिसते, ही एक चांगली बाब आहे. 

शालेय शिक्षणातील विद्यार्थ्यांची गळती थांबवण्यावर भाष्य आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात सर्वाना समान पातळीवर आणण्याची चर्चा महत्त्वाची आहे. परंतु उच्च शिक्षणात गरिबांचे विद्यापीठ, मध्यमवर्गीयांचे विद्यापीठ आणि श्रीमंताचे विद्यापीठ अशी मोठी विषमता होण्याचा मोठा धोका या धोरणात दिसत आहे. 

विद्यापीठापासून महाविद्यालयांचे संलग्ननिकरण रद्द करून महाविद्यालयांना स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा देणे, महाविद्यालयाने त्यांचे अभ्यासक्रम ठरवणे आणि पदव्या वाटणे ही बाब अतिशय गंभीर आहे. खाजगी महाविद्यालय जर पदव्या वाटू लागले तरी या देशातील पदवीचा दर्जा काय राहील. 

कोठारी आयोग, यशपाल कमिटी यांचाही प्रभाव अहवालात जाणवतो. सर्वसामान्यचे शिक्षण या धोरणातून निश्चितच महाग होणार आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या मागासलेला वर्ग, मागासवर्ग यांच्या समोर भविष्यात मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. शेवटी सरकार यासाठी किती अर्थिक तरतुद करणार? यावर आराखडया चे भवितव्य अवलंबून आहे. 

Edit-Pratap Awachar
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com