औरंगाबाद : कोरोना विषाणूमुळे भारत सरकारने देशबंदीचा निर्णय घेतला. १५ एप्रिल नंतरची परीस्थितीही अनिश्चित आहे. त्यामुळे विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घ्यावा, असे निवेदन कुलपती तथा राज्यपाल आणि उच्चशिक्षणमंत्री यांना डॉ. उल्हास उढाण यांनी पाठवले आहे.
कोरोना साथीला रोखण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सोशल डिस्टन्सींग आवश्यक असल्याचे जगातील सर्व तज्ञांचे मत आहे. मार्च/एप्रिल परीक्षेचे महिने म्हणून ओळखले जातात. परंतु या प्रसंगामुळे होणाऱ्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थी आपापल्या गावी रवाना झाले आहेत. परीक्षा कधी होणार? की नाही होणार? पुढचं आमचं शैक्षणिक भवितव्य काय? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहेत.
याबाबतचा निर्णय तातडीने होणे अपेक्षित आहे. एप्रिलनंतर परिक्षा घ्यावयाच्या म्हटले तर सर्वच यंत्रणेवर ताण येणार आहे. फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचा विचार केला तरी, जवळपास चार लाख विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला साधारणतः दोन ते अडीच महिन्याचा कालावधी लागतो.
हे वाचले का? - बामुतील पदव्युत्तरच्या परीक्षा पुढे ढकलल्या
अगोदरच परीक्षा लांबल्यामुळे आणि त्या परत घेण्याचा निर्णय झाला तर, आगामी वर्षातील शैक्षणिक वेळापत्रक संपूर्णपणे विस्कळीत होणार आहे. म्हणून यावर्षी राष्ट्रीय आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन जनहिताच्या व विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे ओझे कमी करावे. अशी विनंती करण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.