Video : रायरेश्वराच्या विकासाचा निधी आधीच्या सरकारने अडवला

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबादः रायरेश्वर किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी आधीच्या सरकारने निधी देण्याचे कबूल केले होते. स्थानिक आमदार संग्राम थोपटे आणि मी स्वःत त्यासाठी पाठपुरावा केला होता. एका कार्यक्रमानिमित्त तत्कालीन पर्यटनमंत्री जयकुमार रावल रायरेश्वरला आले असता, त्यांनी निधी देण्याचे मान्य केले होते, पण अद्याप हा निधी मिळालेला नाही, असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.  

रायरेश्वराच्या विकासासाठी मी अनेकदा पाठपुरावा केला, पण निधी मिळाला नाही. आता नव्या सरकारकडे रायरेश्वराच्या विकासासाठी आपण निधी मागणार आहोत, अशी माहितीही सुप्रिया सुळे यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना दिली.

औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या सुप्रिया सुळे त्यांच्या उपस्थितीत पैठण, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी रायरेश्वर गडाच्या दुरावस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली. 

आधीच्या सरकारकडे आपण स्थानिक आमदारांच्या सोबत रायरेश्वराच्या दुरुस्ती आणि विकासासाठी निधीची मागणी केली होती. तेव्हाचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल एका कार्यक्रमा निमित्त रायरेश्वरला आले होते. त्यावेळी निधी देण्याची घोषणा त्यांनी केली होती.

प्रत्यक्षात मात्र वेळोवेळी पाठपुराव करून देखील आधीच्या सरकारने निधी उपलब्ध करून दिला नाही अशी टिका सुप्रिया सुळे यांनी केली. आधीच्या सरकारने निधी दिला नसला तरी आताच्या सरकारकडून निधी मिळवू आणि रायरेश्वराचा विकास करू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com