'अर्थिक निकषांवर आरक्षण विवादास्पद विषय'

'अर्थिक निकषांवर आरक्षण विवादास्पद विषय'

औरंगाबाद : देशाच्या घटना समितीमध्ये सखोल चर्चा झाल्यानंतरच जातीच्या आधारावर आरक्षण देण्यात आलेले आहे. राजकीय फायद्यांसाठी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आनंदराज आंबेडकर आले होते. त्यावेळी त्यांनी संवाद साधला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर चौफेर चर्चा करुनच आरक्षण देण्यात आलेले आहे. देशातील जातीव्यवस्था ही समता नाकारणारी आहे. माणसाला जात पाहूनच वागणूक दिली जाते. अगदी अलिकडे 18 मार्च 1918 रोजी देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सपत्नीक जगन्नाथ पुरीच्या मंदीरात गेले, त्यावेळी त्यांना गर्भ प्रवेशापासून रोखण्याचा प्रयत्न झाला.

देशाच्या प्रथम नागरिकाला केवळ जातीमुळे अशी हिन वागणूक मिळते, म्हणजेच जातीयवाद हा आजही या देशात सुरुच आहे. जात व्यवस्था दूर करण्यासाठीच ज्या जाती उपेक्षीत आहेत, त्यांचा स्थर उंचविण्यासाठी त्यांना आरक्षण दिलेले आहे. आर्थिक निकाष ही बदलणारी प्रक्रिया आहे, आर्थिक स्तर हा केव्हाही बदलू शकतो, त्यामुळे आर्थिक निकाषावर आरक्षण देण्याची भूमिका म्हणजे दिशाभूल करणारी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com