महिनाभरात घटले २१९ टॅंकर

Water Tanker
Water Tanker

औरंगाबाद - पावसाळ्याला सुरवात झाल्यानंतर जिल्ह्यात महिनाभरात कमीअधिक प्रमाणात झालेल्या पावसाने ग्रामीण भागातील जनतेची पाण्यासाठी टॅंकरमागे होणारी धावाधाव कमी केली आहे. जूनअखेरपर्यंत टॅंकरची संख्या कमी झाल्याने टंचाई नियोजन कार्यक्रमाला मुदतवाढ घेण्याची आवश्‍यकता भासणार नसल्याचे सूत्रांनी मत व्यक्‍त केले. महिनाभरात जिल्ह्यात २१९ पाण्याचे टॅंकर कमी झाले आहेत.

गेल्या हंगामात पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात पाण्याच्या तीव्र टंचाईला जिल्ह्याला सामोरे जावे लागले त्या पार्श्‍वभूमीवर पाणीटंचाईची आराखड्यानुसार जूनअखेरपर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील १६ लाख ६५ हजार ४६२ लोकसंख्येच्या ७७६ गावे आणि २९६ वाड्यांमध्ये एक हजार ११६ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. यंदा पावसाला सुरवात झाल्यापासून काही मंडळांत अतिवृष्टी, तर काही भागांत साधारण पाऊस झाला. यामुळे बंधाऱ्यांत पाणी आले. काही सिमेंट बंधारेही भरले. पर्यायाने पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत बऱ्यापैकी पाझरू लागल्याने काही गावांत पिण्याच्या पाण्याची तीव्रता कमी झाली. यामुळे २१९ टॅंकर कमी झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com