42 कोटींची मागणी, मिळाले 11 कोटी

File photo
File photo

कळंब (जि. उस्मानाबाद) : परतीच्या पावसामुळे तालुक्‍यातील 67 हजार 683 शेतकऱ्यांपैकी 61 हजार 273 शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील 55 हजार 583 हेक्‍टर सोयाबीन, दोन हजार 377 हेक्‍टर कापूस, दोन हजार हेक्‍टर ज्वारी, एक हजार 200 हेक्‍टर मका पिकांचे नुकसान झाले असून, 42 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मात्र केवळ 11 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आता मागणी करण्यात आलेला उर्वरित निधी कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 
परतीच्या पावसाने जमिनी खरडून खरीप हंगामातील सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसानभरपाई कधी मिळेल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. खरीप पिकांची काढणी करून शेतकरी रब्बीतील पिके घेण्याची तयारी करतात. मात्र, पावसामुळे शेतात तण वाढले असून, पाणी साचल्याने जमिनीचा वाफसा झाला नाही.

पावसाचा फटका सर्वाधिक सोयाबीनला

रवातीला पावसाअभावी मूग, उडदाचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. त्यामुळे संपूर्ण मदार सोयाबीन पिकावर होती. सोयाबीन व कापूस पिकांतून आर्थिक उभारी मिळेल, अशी अपेक्षा असताना सोयाबीन काढणीच्या वेळी पावसाने नुकसान केले. यंदा खरिपातील 69 हजार 805 हेक्‍टरवर पेरणी म्हणजे 108 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. पावसाचा फटका सर्वाधिक सोयाबीन, कापूस, ज्वारी, मका पिकांना बसला आहे. यात सोयाबीन 55 हजार 583, कापूस दोन हजार 377, ज्वारी दोन हजार हेक्‍टर व मका एक हजार 200 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

परतीच्या पावसाने मोठे नुकसान 
दरम्यान, पावसाच्या फटक्‍याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानाचे मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. शेतकऱ्यांना नुकसानीची आर्थिक मदत मिळावी म्हणून संबंधित प्रशासनाकडून रात्रीचा दिवस करण्यात आला. कृषी विभागाने 42 कोटी रुपयांची मागणी केली आहे. 11 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. 

आठ हजारांत पेरणीही होणार नाही 
शासनाने दोन हेक्‍टरपर्यंत आठ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांना भरसाट खर्च करावा लागतो. शासनाकडून मिळणारी ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचे शेतकरी प्रभाकर बावळे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com