माझ्या आजोबांच्या अस्थी तरी द्या! 

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद -  ""आज आपण महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती साजरी करीत आहोत; मात्र रेवा (मध्यप्रदेश) येथील महात्मा गांधी यांच्या अस्थी गांधी जयंतीदिनाच्या दिवशीच चोरीस गेल्या. माझ्या आजोबांच्या अस्थी तरी आम्हाला द्या'', अशी भावनिक मागणी गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी शनिवारी (ता. पाच) पत्रकार परिषदेत केली. एका कार्यक्रमानिमित्त ते शहरात आले होते. 


श्री. गांधी म्हणाले, ""कॉंग्रेस असो वा भाजप दोन्ही पक्षांनी आपल्या सोईनुसार महात्मा गांधीजींचा वापर करून घेतला आहे. देशातील परिस्थिती पाहता आता या देशाला नवीन राष्ट्रपिता मिळाला असेही दाखविले जात आहे. त्याचबरोबर गांधीजींच्या प्रतिमेची विटंबना करून त्यावर "गद्दार' असे लिहिण्यात आले. या घटनेला तीन दिवस पूर्ण होत आले. तरीही मध्यप्रदेश सरकार, केंद्रसरकारकडून समाजकंटकावर कोणतीही कारवाई केली गेली नाही; एवढेच नाही तर साधी प्रतिक्रियाही दिली गेली नाही. त्यामुळे गांधीजींच्या नावावर राजकारण करू पाहणाऱ्यांना आता गांधीची अवहेलना कशी सहन होत आहे. गांधीजींच्या मारेकऱ्यांचे समर्थन करणाऱ्यांनीच हा प्रकार घडून आणला असावा'', अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. 

साबरमतीच्या जमिनीवर सरकारचा डोळा 
साबरमती आश्रम (गुजरात) येथील 36 एकर जमिनीवर सरकारचा डोळा आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांना घर खाली करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. गांधीजींचे स्मरण करून देणाऱ्या सर्व वस्तूही सरकार जप्त करू पाहत आहे. त्याही पलीकडे देशभरातील गांधीजींच्या विचाराने चालणाऱ्या संस्थावर घाला घालण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. एका प्रकारे गांधी विचार संपविण्याचा घाट घातला जातोय, अशी टीका तुषार गांधी यांनी केली; परंतु असे होणार नाही. येथे लोकशाही असून, गांधी विचारांच्या लोकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com