लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या ८४ जणांवर गुन्हे 

जालना ः अंबड चौफुली येथे वाहनांची तपासणी करताना वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी. 
जालना ः अंबड चौफुली येथे वाहनांची तपासणी करताना वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी. 

जालना -  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून देशात लॉकडाऊन लागू केले आहे. मात्र, तरी देखील जालन्यात अनेक रिकामटेकडे रस्त्यावर विनाकारण फिरत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या ८४ जणांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहे. तर १५ जण अटक करण्यात आली आहे. तर २६ हजार ८०८ रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन करीत आहेत. मात्र, रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास तयार नाही. ही गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांकडून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींना स्टिकर्स देण्यात आले आहेत. तर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे.

आतापर्यंत लॉकडाऊन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ८४ जणांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर १५ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून २६ हजार ८०८ रुपयांचा दंडही वसुल करण्यात आला आहे. 

दरम्यान जिल्ह्याच्या सीमा बंद करीत पोलिस प्रशासनाने ३२ चेकपोस्ट तयार केले आहेत. तर शहरासह जिल्ह्यात ही ठिकठिकाणी पोलिसांकडून चेकपोस्टची स्थापना करण्यात आली आहेत. या चेकपोस्टवर अनावश्यक वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. 

मद्य विक्री ता.१४ एप्रिलपर्यंत बंद 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ता.१४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचे आदेश दिले आहे. त्यामुळे ता.१४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत. 

चौकाचौकात पोलिस तैनात 

संचारबंदीच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून चौका-चौकात तपासणी केली जात आहे. ज्या वाहनांकडे अत्यावश्याक सेवेचा पोलिस प्रशासनाचा परवाना आहे. त्या वाहनांना सोडून दिले जात आहे. पोलिस प्रशासनाकडून शहरात दाखल होणाऱ्या मार्गावरील प्रत्येक चौक सीलबंद करण्यात आले आहे. तसेच शहरातील प्रत्येक चौकात बॅरिकेट बसविण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या दुचाक्या, खासगी वाहनांची चौका-चौकात तपासणी केली जात आहे. या तपासणी दरम्यान चालकाकडे पोलिस प्राशासनाने दिलेला अत्यावश्यक सेवेचा परवाना आहे का ? दुचाकी, चार चाकी वाहन चालविण्याचा परवाना आहे का ? वाहनांची कागदपत्रे आहेत काय ? याची विचारणा केली जात आहे. ज्या वाहनाधारकांकडे पोलिसांचा अत्यावश्यक सेवेचा पोलिस प्रशासनाचा परवाना नाही. त्यांना शहरात फिरू दिले जात नाही. तसेच त्यांच्यावर कारवाई देखील केली जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com