औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत चारशे जणांचा वीजपुरवठा तोडला 

MSEDCL
MSEDCL

औरंगाबाद - थकीत वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील 390 ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित केल्याची माहिती महावितरणचे मुख्य
अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली. 

औरंगाबाद व जालना जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात ही कारवाई करण्यात आली आहे. फेब्रुवारीअखेर 63 हजार 919 वीज ग्राहकांकडे 15 कोटी 63 लाख रुपये थकबाकी आहे. त्यात औरंगाबाद शहर मंडळात 20 हजार 742 ग्राहकांकडे 6 कोटी 10 लाख, औरंगाबाद ग्रामीण मंडळात 25 हजार 479 ग्राहकांकडे 5 कोटी 53 लाख, तर जालना मंडळात 17 हजार 698  ग्राहकांकडे 4 कोटी रुपये थकबाकी आहे. लघुदाब घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, शहरी भागातील पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा वर्गवारीतील या ग्राहकांना वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना एसएमएसद्वारे देण्यात आलेल्या आहेत. वीजबिल भरण्याच्या आवाहनास प्रतिसाद न देणाऱ्या यातील 62 ग्राहकांचा वीजपुरवठा 2 लाखांच्या थकबाकीसाठी कायमस्वरूपी
खंडित करण्यात आला आहे; तसेच 328 ग्राहकांचा वीजपुरवठा 26 लाखांच्या थकबाकीसाठी तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. या मोहिमेत 9 हजार 151 ग्राहकांकडून 2 कोटी 5 लाख रुपये वसुलीही करण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी वीजबिलांचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन मुख्य अभियंता सुरेश
गणेशकर यांनी केले आहे. 
 
 घरबसल्या बिल भरणा 
वीजबिल भरण्यासाठी वीजबिल भरणा केंद्रांसह व घरबसल्या ऑनलाइन पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच महावितरणच्या मोबाईल ऍपचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com