वाणातून जमले सात क्विंटल धान्य; दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी उपक्रम
औरंगाबाद : सण-परंपरा साजरे करताना सामाजिक जाणिवा जपण्याची
जागरूकता जिल्हा कोष्टी समाज सेवा मंडळातर्फे आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात दिसून आली. या कार्यक्रमात प्रत्येक महिलेने वाण म्हणून धान्य आणले आणि पाहता पाहता 6 क्विंटल गहू आणि एक क्विंटल तांदूळ असेसात क्विंटल धान्याचे वाण जमा झाले.
हे धान्य अन्न वाचवा समितीच्या सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आले. अन्न वाचवा समितीने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी 'भिक्षांदेही' उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत समाजप्रबोधन करून धान्य गोळा करून ते दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
जिल्हा कोष्टी समाज सेवा मंडळातर्फे गेल्या शनिवारी (ता. 2) साखरे मंगल
कार्यालयात हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये जवळपास 250 महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांना केलेल्या अहवालाप्रमाणे प्रत्येकीने यथाशक्ती वाण म्हणून धान्य आणले होते. जमा झालेले धान्य अन्न वाचवा समितीचे चंद्रकांत वाजपेयी, पूजा सोनवणे, सुमित्रा गावंडे, रूपाली वाहुळे, सोनाली वाहुळे यांच्याकडे सोपविण्यात आले.
या उपक्रमासाठी कोष्टी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा जयश्री लकारे, रुपाली तिदार, शुभदा निऱ्हाळी, प्रमिला कथले, लक्ष्मी बर्गे, कांचन साखरे तसेच समाजाचे अध्यक्ष महेश निऱ्हाळी, चंद्रकांत बर्गे, अनंत बुरकुले, डॉ. उदय फळे, महेश धीमते यांनी पुढाकार घेतला
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.