औरंगाबाद : पाणीप्रश्नी कुलगुरूंच्या घरासमोर विद्यार्थिनींचा मध्यरात्री ठिय्या 

students
students

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात काल दिवसभर पाण्याचा टिपूसही नव्हता. तीनशे ते साडेतीनशे मुलींनी गुरुवारी (ता. 4) रात्री दहाच्या सुमारास अचानक रस्त्यावर उतरले आणि कुलगुरूंच्या घरासमोर ठिय्या दिला. मध्यरात्री पर्यंत हा गोंधळ सुरुच होता. दरम्यान, दोनशेच्या जवळपास मुलांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी आश्‍वासन दिल्याने आंदोलक वसतिगृहात परतले. 

विद्यापीठातील वसतिगृहात सुविधांचा वानवा आहे. त्यातच पाणी नसल्याने विद्यार्थिनींनी आक्रमक होत कुलगुरूंच्या निवासस्थानासमोर ठिय्या देत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. दरम्यान, डॉ. काळे हे गेस्ट हाऊसकडे जात असताना त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी विचारपूस केली असता, पाणी नसल्याने विद्यार्थिनी संतप्त झाल्याचे लक्षात आले. त्यांनी प्र-कुलगुरूंशी संपर्क साधत त्यांच्या कानावर हा प्रकार घातला आणि विद्यार्थिनींना समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले. शिवाय शुक्रवारी विद्यार्थ्यांना घेऊन प्र-कुलगुरूंची भेट घेणार असल्याचेही डॉ. काळे म्हणाले. त्यामुळे आंदोलकांनी नमते घेतले. दरम्यान, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे हे दौऱ्यावर आहेत. 

का आले नाही पाणी? 
विद्यापीठाच्या वसतिगृहात अनेक समस्या आहेत. दरम्यान, गुरुवारी कंत्राटी कामगारांचे आंदोलन असल्याने वसतिगृहात पाणीपुरवठा झाला नाही. परिणामी, विद्यार्थिनींची गैरसोय झाली. 

मुलींच्या वसतिगृहात तत्काळ महिला कर्मचारी वाढविण्यात येतील; तसेच तत्काळ पाणीही सोडण्यात आले. 
- डॉ. अशोक तेजनकर, प्र-कुलगुरू 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com