संमेलनाध्यक्ष नाराज, मुंबईला का निघून गेले?

Osmanabad News
Osmanabad News

संत गोरोबा काका साहित्य नगरी, उस्मानाबाद : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणासाठी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे ते नाराज झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली; पण या विषयावर बोलणे दिब्रिटो यांनी टाळले. त्यांना पूर्ण भाषण करता न आल्याने काही लेखकांनी आणि वाचकांनीही नाराजी व्यक्त केली. त्यामुळे साहित्य संमेलनाचा उदघाटन सोहळा दुसऱ्या दिवशीही चर्चेत राहिला.

साहित्य संमेलनाचे उदघाटन कविवर्य ना. धों. महानोर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 10) झाले. त्यानंतर किंवा मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या भाषणानंतर दिब्रिटो यांना भाषणाची संधी द्यायला हवी होती; पण तसे झाले नाही. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अनेकांचे सत्कार सोहळे, वेगवेगळ्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यातच साहित्य महामंडळाने वेळ घालवला. त्यातच काही मान्यवरांचे भाषणही लांबले. त्यामुळे दिब्रिटो यांना पुरेसा वेळ मिळाला नाही.

दिब्रिटो यांनी 56 पानांचे भाषण लिहिले होते. ते वाचून दाखवण्यासाठी किमान एक ते दीड तासाचा वेळ त्यांना देणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे त्यांनी लिखित भाषण बाजूला ठेऊन 20 ते 25 मिनिटे उत्स्फूर्तपणे वाचकांशी संवाद साधला. पण मराठी भाषा, साहित्य अशा विषयावर त्यांना सविस्तर भूमिका मांडता नाही. दरम्यान, आजारपणामुळे दिब्रिटो यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे संमेलनाच्या समारोप सोहळ्याला ते नसतील, असे सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com