अनुराधा चव्हाणांच्या एन्ट्रीने राजकीय पक्षात तर्कवितर्क

Phulambri
Phulambri

फुलंब्री : फुलंब्री विधानसभा मतदार संघ हा फुलंब्री आणि औरंगाबाद या दोन तालुक्यात विभागलेला असल्यामुळे फुलंब्री तालुक्यानंतर आता औरंगाबादमध्येही अनुराधा चव्हाण यांनी स्वरानुभूती दिवाळी पहाट या कार्यक्रमाच्या माध्यमातून दमदार एन्ट्री घेतल्याने राजकीय पक्षात तर्कवितर्क सुरु आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने अनुराधा चव्हाण यानी आपली ताकद पक्षाला दाखवून दिली असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले तर समारोप विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केला.

अनुराधा चव्हाण यांनी 2014 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळविली होती. परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह वरिष्ठ नेत्यांनीही पक्षाच्या विरोधात काम केल्यामुळे अनुराधा चव्हाण यांना स्वत:च्या हिमतीवर सुमारे 32 हजार मतदान पडले होते. अनुराधा चव्हाण यांनी 32 हजार मतदान घेतल्याने याचा फायदा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना झाला होता. तर कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांचा केवळ तीन हजाराच्या मतांनी निसटता पराभव झाला. त्यानंतर फुलंब्री तालुक्यात राष्ट्रवादी पक्षात गटतट निर्माण झाल्याने अनुराधा चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यासह भाजपात प्रवेश केला.

त्यानंतर 2017 च्या जिल्हा परिषद निवडणूक श्रीमती चव्हाण यांनी भाजपकडून लढविली. त्यात त्यांनी जिल्ह्यातील विजयी उमेदवाराच्या तुलनेत सर्वात जास्त मतदान घेऊन एकहाती विजय मिळवून भाजपात आपले वेगळे वलय निर्माण केले. 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून अनुराधा चव्हाण यांच्याकडे पहिले जात आहे. मात्र या मतदार संघाचे नेतृत्व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे करीत असल्यामुळे चव्हाण यांना अडचण निर्माण झाली आहे. परंतु हरिभाऊ बागडे यांना औरंगाबाद लोकसभा निवडनुकीला पाठविण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यासह कार्यकर्त्यांनी मनधरणी सुरु केली आहे. त्यानंतर मतदार संघात संभाव्य उमेदवार म्हणून अनुराधा चव्हाण यांच्याकडे पाहण्यात येते. अनुराधा चव्हाण या हरिभाऊ बागडे व रावसाहेब दानवे या दोघांना सोबत घेऊन काम करीत असल्याने भाजप पक्षातही चव्हाणांनी वेगळा ठसा उमटविला आहे.

फुलंब्री मतदार संघातील औरंगाबाद तालुक्यात संपर्क वाढविण्यासाठी जिमखाना येथे दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करून शहराच्या राजकारणात प्रवेश केला आहे. महानगर पालिकेचे आठ वार्ड फुलंब्री विधानसभा मतदार संघात असून याकडे आमदार, खासदार फिरकत तेथील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्यामुळे या स्वरानुभूती दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र सूरु आहे. या कार्यक्रमात हजारो नागरिकासमोर अनुराधा चव्हाण यांनी आपली छाप पाडली आहे. नवीन व सक्षम महिला नेतृत्व आल्यानंतर नक्कीच या भागाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे एका औरंगाबाद शहरातील भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सकाळशी बोलतांना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com