औरंगाबादेत सुरक्षेसाठी साडेतीन हजार पोलिसांना बंदोबस्त

   Aurangabad City security
Aurangabad City security

औरंगाबाद: अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर औंरगाबाद शहरातील संवेदनशील भागात सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. संपूर्ण शहरात तीन हजार 500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत. या शिवाय 200 अधिकारी व राज्य राखीव बलाच्या दोन तुकड्या शहरात गस्त घालत आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. 

राज्यात मुंबईनंतर सर्वाधिक संवेदनशील शहर म्हणून औरंगाबादकडे पाहिले जाते. या पार्श्‍वभूमीवर गेल्या चार ते पाच दिवसापासून सुरक्षेसाठी पोलिसांतर्फे आढावा घेतला जात आहे. जे अधिकारी सुट्टीवर गेले होते, त्यांची सुट्टी रद्द करून कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. एवढेच नव्हे तर शहरातील बिअरबार, मुख्य बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

पोलिस आयुक्‍त म्हणाले, आजचा दिवस तणावाचा असल्यामुळे प्रत्येक नागरिकांने संयम बाळगावा. तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कॉमेंट करून नये, पोलिसांना आप-आपल्या पद्धतीने सहकार्य करत मदत करावी. शहरात सुरक्षेसाठी ठीक-ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. आम्ही काही लोकांशी चर्चा केली तेव्हा ते म्हणाले, नागरिकांनाही विश्‍वास आहे. काही गडबड होणार नाही. लोकांनीही कोणत्या अफवा आणि इतर तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टीवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद यांनी केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com