औरंगाबाद मध्यमध्ये एक वाजेपर्यंत 27.58 टक्के मतदान

छायाचित्र
छायाचित्र

औरंगाबाद - मध्य मतदारसंघात सकाळच्या सत्रात संथ गतीने मतदान झाले मात्र दुपारनंतर अनेक मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत फक्त फक्त 6.48 टक्के मतदान झाले होते. आता एक वाजेपर्यंत 27.58 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक कार्यालयाने जाहीर केले आहे.

जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात सोमवारी (ता.21) सकाळी सात वाजता मतदानास सुरवात झाली आहे. मात्र सुरवातीच्या सत्रात पावसामुळे मतदान संथगतीने सुरू होते. नऊ वाजेनंतर मतदानात काहीशी गती येऊन सकाळी 11 वाजेपर्यंत 14.22 टक्के मतदान झाले. आता ढगाळ वातावरण असले तरी कुठेच पाऊस नसल्याने अनेक मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत. एक वाजेपर्यंत 27.58 टक्के मतदान झाले आहे.

औरंगाबाद  मध्य मतदार संघात सध्या शांततेत मतदान सुरु असून कुठे ही अप्रिय घटना घडलेली नाही. काही ठिकाणी मतदारांना नाव शोधण्यासाठी कसरत करावी लागत होती.  तर एकाच कुटुंबातील व्यक्तींचे नावे दोन वेगवेगळ्या केंद्रावर होते. या शिवाय मतदारांना आणण्यासाठी निवडणुक आयोगाकडून ही रिक्षांची व्यवस्था करण्यात आली.  काही ठिकाणी मशिनमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने मतदान प्रक्रियेस विलंब लागत आहे. मात्र, असे असताना मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com