तीन आठवड्यांनी शहरात परतला पाऊस

औरंगाबाद - शहरात पावसामुळे शाळा सुटलेल्या विद्यार्थ्यांची उडालेली तारांबळ.
औरंगाबाद - शहरात पावसामुळे शाळा सुटलेल्या विद्यार्थ्यांची उडालेली तारांबळ.

दुपारनंतर लावली हजेरी, २४ तासांत ०.३ मिलिमीटरची नोंद

औरंगाबाद - गायब झालेला पावसाने अखेर तीन आठवड्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर मंगळवारी (ता. १८) शहरात हजेरी लावली. सकाळपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या शहराला दुपारनंतर थोड्याफार प्रमाणात का होईना दिलासा दिला. सायंकाळी साडेआठपर्यंत ०.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. रात्री नऊ नंतरही अधुनमधुन हलक्‍या स्वरुपाच्या पाऊसाच्या सरी कोसळल्या.

औरंगाबाद शहरातून सुमारे तीन आठवडे गायब असलेल्या पावसाने मंगळवारी (ता.१८) आपली उपस्थिती नोंदवली. या महिन्यात अठरा पैकी केवळ चारच दिवस पाऊस पडला असून, उर्वरित काळ हा कोरडाच गेला आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्यात ११ दिवस पाऊस पडला होता आणि त्यात मोठ्या पावसाचाही समावेश असल्याने जूनमध्ये १५० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. औरंगाबादेत सरासरीच्या तुलनेत केवळ ८३.४ टक्के पाऊस झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com