जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ

Jayakwadi Dam
Jayakwadi Dam

पैठण (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. सद्यस्थितीत ३० हजार क्युसेक वेगाने पाणलोट क्षेत्रातुन पाणी दाखल होत असुन धरणाचा पाणीसाठा ९२ टक्के झाला आहे. धरणातून गोदापात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्याबाबत औरंगाबाद येथे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. स्वामी आज सकाळी दहा वाजता बैठक घेणार आहे. अशी माहीती धरण सहायक अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

हा निर्णय झाल्यानंतर सायंकाळपर्यंत पाण्याची आवक व पाणी पातळीत होणारी संभाव्य वाढ लक्षात घेऊन पाणी सोडले जाईल, असे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, धरण परिसरात पाऊस सुरु असुन वारा वाहत असल्याने धरणाच्या एकुण २७ वक्र दरवाजातून पाण्याच्या लाटा बाहेर पडत आहे. गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा यापुर्वीच देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com