औरंगाबाद : महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणीवरुन औरंगाबादचे राजकारण तापल्याचे दिसत आहे. खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाराणा प्रताप यांचा पुतळा न उभारता त्या पैशातून सैनिकी शाळा सुरु करण्याची मागणी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. त्यावर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. दानवे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप हे देशाचे स्वाभिमान आहे. जलील साहेब महापुरुषांच्या पुतळ्यांकडून आपल्याला चांगल्या कामाला प्रेरणा मिळत नसावी. आम्हाला ती मिळते. केंद्र सरकारने देशातील १०० शाळा या वर्षी सलंग्नित करुन त्यांना सैनिक शाळेचा दर्जा द्यायचे ठरवले असल्याचे आठवण त्यांनी इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांना करुन दिली. (Ambadas Danve Criticize Imtiaz Jaleel Over Maharana Pratap Statue Politics In Aurangabad)
यातील एखादी शाळा औरंगाबादेत (Aurangabad) आणा असे म्हणत शहरातील केंद्रीय विद्यालयाच्या विस्तारासाठी दिल्लीत प्रयत्न करण्याचा सल्ला दानवे यांनी दिला. महाराणा प्रताप यांचा पुतळा औरंगाबादेत होणार, त्याला जर कोणी विरोध केला तर ते आम्ही सहज मोडून काढू. कोणतीही शक्ती महाराणा प्रताप यांचा पुतळा होण्यापासून रोखू शकणार नाही, असा इशारा अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी जलील यांना दिला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.