औरंगाबाद : जिल्ह्यात ५२४ कोटींचे पीककर्ज वाटप

अनिलकुमार दाबशेडे : बँकांना १ हजार ३५४ कोटींचे उद्दिष्ट
Aurangabad 524 crore crop loans
Aurangabad 524 crore crop loansSakal

औरंगाबाद : खरीप हंगामासाठी दरवर्षी राष्‍ट्रीयीकृत बँकांना पीककर्ज वाटपासाठी उद्दिष्ट ठरविण्यात येते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून उद्दिष्टापेक्षा जास्त कर्ज वाटप करण्यात येत आहे. खरीप हंगामासाठी पैसा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा सहकारी तसेच राष्ट्रीयीकृत बँकांना यंदा १ हजार ३५४ कोटी ५९ लाख १७ हजार रुपये पीक कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात आतापर्यंत ५२४ कोटींचे वाटप करण्यात आले आहे, त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १८६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक ( सहकारी संस्था) अनिलकुमार दाबशेडे यांनी दिली. गेल्या खरीप हंगाम याच कालावधीत एकूण १९७ कोटींचे पीक कर्ज वाटप झाले होते.

जिल्हा बँकेला खरीप हंगामासाठी ४२४ कोटी १० लाख ४६ हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. राष्ट्रीयीकृत व खासगी व्यापारी बँकांना ७६३ कोटी ४३ लाख ५२ हजार तर ग्रामीण बँकेला १६७ कोटी ५ लाख १९ हजार रुपये असे एकूण १ हजार ३५४ कोटी ५९ लाख १७ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात आतापर्यंत जिल्हा बँकेने १८६ कोटी १४ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण ४३.८९ टक्के आहे. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांनी मिळून २२२ कोटी १६ लाखांचे (२९.१० टक्के) तर ग्रामीण बँकेने ११६ कोटी २७ लाख रुपये (६९.६० टक्के) असे मिळून २४ जून अखेरपर्यंत जिल्ह्यातील ८६ हजार ५३२ सभासद शेतकऱ्यांना एकूण ५२४ कोटी ५७ लाख ६० हजार रुपयांचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण ३८.७३ टक्के एवढे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com