औरंगाबाद : गहू कमी अन्... तांदूळ जास्त मिळणार

फुलंब्री : रेशनकार्डधारकांमध्ये नाराजीचा सूर
Aurangabad Fulbari ration card holders wheat Less and rice more
Aurangabad Fulbari ration card holders wheat Less and rice moresakal

फुलंब्री : तालुक्यातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबांना रेशनवरील मिळणाऱ्या धान्याचा मोठा आधार असतो. मात्र, रेशनवर देण्यात येणाऱ्या प्रतिकार्ड गव्हाचे प्रमाण आता कमी करण्यात आले आहे. त्याऐवजी आता तांदूळ जास्त वाटप केला जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

रेशन दुकानांत गहू, तांदूळ, चणाडाळ, तूरडाळ व साखरही वितरित केली जात असते. मात्र, चणाडाळ व तूरडाळ ही सणासुदीच्या दिवसांतच वितरित केली जाते. गहू व तांदळाचे योजनेंतर्गत तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत अंत्योदय योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थीना दिल्या जाणाऱ्या धान्याच्या परिणामामध्ये नुकतेच बदल करण्यात आले आहेत. त्याबाबत पुरवठा विभागाने याच प्रमाणे नियमितपणे वितरण करण्याचे आदेश दिले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंब लाभ योजनेंतर्गत तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय योजनेतील प्राधान्य कुटुंब व अंत्योदय कुटुंबातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.

त्यानुसार २०१३ अंतर्गत अंत्योदय योजनेत या महिन्यापासून तांदळाचे प्रमाण दीडपट राहणार आहे. तर त्यातुलनेत गव्हाचे प्रमाण कमी असल्याने लाभार्थ्यामध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. पूर्वी याच योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभ योजनेस प्रतिलाभार्थी ३ किलो गहू व २ किलो तांदूळ वितरित केला जात होता. त्यात बदल करण्यात आला असून प्रतिलाभार्थी २ किलो गहू व ३ किलो तांदूळ दिला जाणार असल्याची माहिती पुरवठा विभागातील सूत्रांनी दिली.

तांदूळ विक्रीचे प्रमाण वाढले

फुलंब्री तहसील कार्यालया अंतर्गत असलेल्या पुरवठा विभागाच्या माध्यमातून अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना तांदळा पेक्षा गहू जास्त मिळत होते. मात्र, आता या महिन्यापासून यात बदल होणार असून तांदूळ जास्त तर गहू कमी मिळणार आहे. ग्रामीण भागामध्ये राशनचे गहू व तांदूळ घेण्यासाठी चार चाकी घेऊन व्यापारी येतात. आर्थिक टंचाईमुळे ग्रामीण भागातील लाभार्थी तांदूळ विकून मोकळे होतात. त्यामुळे शासन देत असलेल्या निकृष्ट तांदूळ चांगले दिल्यास विक्रीचे प्रमाण कमी होणार असल्याची चर्चा लाभार्थ्यास आहे.

प्राधान्य कुटुंब योजना कार्ड संख्या

२३,३३०

अंत्योदय अन्न योजना कार्ड संख्या

२,२९०

प्रत्यक्ष लाभार्थ्यांना असा मिळणार लाभ

  • मोफत धान्य अंत्योदय योजने साठी प्रति लाभार्थी २ किलो गहू व ३ किलो तांदूळ

  • प्राधान्य कुटुंब योजनेसाठी प्रति लाभार्थी १ किलो गहू, ४ किलो तांदूळ असे प्रमाण मे २०२२ पासून वाटप सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com