औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समिती आणि राज्य सरकारच्या पणन विभागातर्फे कोरोनाच्या दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा बाजार समितीत २० ते २३ मे दरम्यान अंबा महोत्सव घेण्यात येणार आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधूदुर्ग, देवगड येथील अस्सल हापूस आणि मराठवाड्याची ओळख असलेला केशरची शहरवासीयांना खरेदी करता यावेत उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेखाली हा अंबा महोत्सव घेण्यात येत असल्याची माहिती बाजार समितीचे मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे यांनी बुधवारी दिली.
बाजार समितीच्या मुख्य इमारती समोर हा महोत्सव होणार आहे. महोत्सवात ३० स्टॉल लागणार आहे. शुक्रवारी फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिकेचे मुख्य प्रशासक अस्तिककुमार पांडेय, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, विक्रम काळे, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा कृषी अधिकारी टी. एस. मोटे, पणनचे उपसरव्यवस्थापक गजानन वाघ, बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे, मुख्य उपप्रशासक पांडुरंग तांगडे, सचिव विजय शिरसाट व सर्व प्रशासक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.