औरंगाबाद : शहरात बारा ई-बाईक जप्त

अधिक क्षमतेच्या लावल्या बॅटऱ्या; परिवहन विभागाची कारवाई
Aurangabad Twelve electric bikes seized Action of traffic Department
Aurangabad Twelve electric bikes seized Action of traffic Departmentsakal

औरंगाबाद : बेकायदेशीर बदल केल्याप्रकरणी १२ ई-दुचाकी आरटीओ कार्यालयाकडून जप्त करण्यात आल्या आहेत. यातील ५ ई-दुचाकी आता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला तपासणीसाठी देण्यात येणार आहेत.

पर्यावरणपूरक ई-बाईकचा बोलबाला सुरु झाल्यानंतर काही ठिकाणी ई-बाईक्सला आग लागल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. ई-बाईकमध्ये मूळ क्षमतेपेक्षा बेकायदेशीर अधिक क्षमतेच्या बॅटरी टाकून किंवा अन्य काही बदल करुन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याने आगीच्या घटना घडत असल्याचा निष्कर्ष आहे.

बेकायदेशीर बदलामुळे ई-दुचाकींना आग लागून अपघाताच्या घटना होत असल्याचे निदर्शनास आल्याने परिवहन आयुक्तांनी राज्यभरात ई-बाईक्सच्या उत्पादक, वितरकांकडे आणि रस्त्यावर चालणाऱ्या ई-बाईक्सची तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचाच भाग म्हणून राज्यव्यापी तपासणी मोहिम सुरु केली आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी औरंगाबाद, जालना आणि बीड अशी तीनही जिल्ह्यात ई-बाईक्स तपासणीचे आदेश दिले. त्यानुसार शहरात २३, २४ मेरोजी तपासणी मोहिम राबवण्यात आली.

आरटीओच्या पथकाने विविध १२ विक्रेत्यांकडील, रस्त्यावर धावणाऱ्या ३९ ई-दुचाकींची तपासणी केली. तपासणीत १२ ई-दुचाकी या नमूद क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेच्या असल्याचे आढळून आल्या. यात ७ वाहने ही विक्रेत्यांकडेच सिल करुन ठेवण्यात आली. तर ५ वाहने जप्त करून आरटीओ कार्यालयात आणण्यात आली. आता या वाहनांच्या तपासणीनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे, असे श्री. मेत्रेवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com