औरंगाबाद : मित्रांसोबत तलावात पोहण्यास गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी सातारा परिसरातील सुधाकरनगरजवळ वाल्मीच्या तलावात घडली. अग्नीशामक दलाच्या जवानांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. गौतम कचरू जाधव (२२, रा. शंभू नगर, गारखेडा परिसर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी सातारा ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
गौतम हा दोन मित्रांसोबत वाल्मीच्या तलावात पोहण्यासाठी गेला होता. ते तिघेही पाण्यात उतरले. मात्र, गौतमला पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खावू लागला. हा प्रकार अन्य दोन मित्रांच्या लक्षात आला. त्यांनी मदतीसाठी बराच धावा केला. मात्र, जवळ कोणीच नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. परिणाम गौतम खोल पाण्यात बुडाला. ही माहिती सातारा पोलिसांना देण्यात आली. त्यांनी अग्नीशामक दलाला कळविल्यानंतर मुख्य अग्निशामक अधिकारी आर. के. सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक अधिकारी मोहन मुंगसे, एल. पी. कोल्हे, छगन सलामबाद, इसाक शेख, दिनेश मुंगसे, प्रसाद शिंदे, अजय कोल्हे यांनी सायंकाळी मृतदेह बाहेर काढला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.