औरंगाबादेत रिक्षांना मिळणार सौरऊर्जेचा आधार!

प्रदूषण नियंत्रणासाठी उपाय, महापालिकेमार्फत अनुदान
Auto-Rickshaw
Auto-Rickshawsakal

औरंगाबाद : शहरांचे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध निर्देश दिले जात आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासोबतच आता शहरातील सुमारे सहा हजार ऑटोरिक्षा सौरऊर्जेवर चालतील, अशा पद्धतीचे बदल केले जातील, असे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

शहरांचे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानुसार स्मार्ट सिटी अभियानात पाच इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यात आल्या आहेत. तसेच पर्यटन वाढीसाठी डबल डेकर इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याची सूचना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिकेला केली आहे. तसेच शहरातील रिक्षा सोलारवर चालविण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना देखील श्री. ठाकरे यांनी केल्या आहेत. याविषयी श्री. पांडेय यांनी सांगितले की, सोलारवर ऑॅटोरिक्षा चालविण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार आहे. पुणे शहरात १३ हजार ऑॅटोरिक्षा सोलारवर चालविण्याची तयारी आहे. औरंगाबाद शहरात सहा हजार ऑ‍ॅटोरिक्षा सोलारवर चालविण्याचे नियोजन केले जात आहे. रिक्षावर सोलारची यंत्रणा बसविण्याचा खर्च कोण करेल? अशी विचारणा केली असता, ज्या रिक्षाचालकांची सोलारवर रिक्षा चालविण्याची तयारी आहे, त्यांना शासन महापालिकेमार्फत अनुदान देईल, असे प्रशासकांनी नमूद केले.

शहरात १३ हजार रिक्षा

शहरात अधिकृत लायसन्सधारक रिक्षांची संख्या सुमारे १३ हजार एवढी असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. यातील निम्म्या रिक्षा सौरऊर्जेवर चालतील, अशी व्यवस्था पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. मात्र याला रिक्षाचालक किती प्रतिसाद देतील, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com