छत्रपती संभाजीनगर येथील राम मंदिराजवळ दोन गटात किरकोळ वादावादी झाली होती. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. कसेबसे हे भांडण मिटले होते. मात्र पुन्हा काही लोक जमले. यावेळी जमावाच्या हातात मोठे दगड, काठ्या आणि जाळपोळीचे साहित्य होते.
दंगलखोरांचा जमाव मंदिराजवळ पोहोचला आणि त्यांनी उपस्थित असलेल्या पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांच्या गाड्या जाळल्या जातात, लाठ्या-काठ्या घेऊन वाहनांची तोडफोड केली. दरम्यान या प्रकरणावर आता राजकारण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी गंभीर आरोप केले आहेत.
इम्तियाज जलील म्हणाले, इतक्या कमी वेळात मुले तिथे कशी जमा झाली. ते लोक कुठून आले. यामध्ये कुणाच संबंध होता हे शोधणे गरजेचे आहे. समाजकंटकांना खुली सूट देण्यात आली होती. गाड्या जाळण्याचे त्यांना सांगितले होते, असा आरोप जलील यांनी केला आहे.
पोलिसांच्या १३ गाड्या अ्न कर्मचारी फक्त १५... -
पोलीस म्हणतात त्यांच्या १३ गाड्या जाळल्या हे मी देखील पाहिल मात्र त्या गाड्यांमधील पोलीस कुठ होते?. घटनास्थळी फक्त १५ पोलीस कर्मचारी होते. मग एका गाडीत फक्त एक पोलिसवाला आला का?, असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी विचारला. मंदिराची सुरक्षा करण्याची पोलिसांची जबाबदारी होती. जाळफोळ थांबवण्याची जबाबदारी त्यांची होती. मात्र वरीष्ठ पोलीस अधिकारी यावेळी कुठे होते. एसआरपीए कुठे होती, असे देखील जलील म्हणाले.
इम्तियाज जलील संतापून म्हणाले, समाजकंटकांना अडीच तास दिले होते. खुली सूट त्यांना देण्यात आली. मंदिरात प्रवेश करण्याचे देखील त्यांना सांगितले होते. १५ पोलीस तिथे मरण्यासाठी सोडले होते. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री कुठे आहेत. राम मंदिराजवळी पोलीस सोडले तर पोलीस कुठेहे नव्हते. खोट असेल तर सीसीटीव्ही फुटेज तपासा.
शहरात शंभर कोटींपेक्षा जास्त पैसे खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, त्या सीसीटीव्ही फूटेजमधील दंगल महाराष्ट्राला, देशाला दाखवा. मी कोणाकडं बोट दाखवत नाहीये आणि कोणावर आरोपही करत नाही. पण, पोलिसांनी आणि सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी मागणी करावी की, हायकोर्टाच्या माध्यमातून याची चौकशी करावी. माझा या सरकावर विश्वास राहिला नाही. दंगल थांबवण्याची जबाबदारी तुमच्यावर दिली होती, पण ती तुम्ही थांबवू शकला नाही, असा घणाघातही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.