कोरोनाला रोखण्यासाठी देशात पहिल्यांदाच होतोय हा प्रयोग... 

corona
corona

औरंगाबाद : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेने तब्बल एक हजार मोबाईल फिवर क्लिनीक सुरु केले आहेत. असा प्रयोग करणारी औरंगाबाद महापालिका देशातील पहिलीच आहे, असे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शनिवारी (ता. १३) सांगितले. 

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासंदर्भात महापालिकेने केलेल्या उपाय-योजनांची माहिती देताना श्री. पांडेय म्हणाले, की पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशानुसार शहरात मोबाईल फिवर क्लिनीक सुरु करण्यात आले आहेत. मोबाईल क्लिनीकसाठी एक हजार टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. एका टीममध्ये दोन कर्मचारी असतील. त्यांना ऑक्सिमीटर आणि थर्मल गन दिली जात आहे. त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या शरीराचे तापमान व शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासायचे आहे. त्याची माहिती एमएचएमएच अॅपवर भरायची आहे.

एकाच वेळी एक हजार मोबाईल फिवर क्लिनीक सुरु करणारी औरंगाबाद महापालिका देशातील पहिलीच आहे, असा दावा श्री. पांडेय यांनी केला. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य शासनाने एमआयडीसीच्यामदतीने कोविड हॉस्पिटल उभारले आहे. या हॉस्पिटलच्या लोकार्पणाच्यानिमित्त पालकमंत्री सुभाष देसाई शुक्रवारी औरंगाबादेत आले होते. यावेळी त्यांनी शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील सगळ्या ११५ वॉर्डांसाठी फिवर क्लिनीक सुरु करण्याचे आदेश दिले होते, असे पांडेय म्हणाले. 

मोहल्ला क्लिनिकसाठी खासगी डॉक्टरांची घेणार मदत 
कोरोनाचा संसर्ग काही केल्या थांबत नसल्याने महापालिकेने आता खासगी डॉक्टरांच्या मदतीने मोहल्ला क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी सांगितले. शहरात कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे हा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेचे प्रयोगावर प्रयोग सुरू आहेत. 

हायरिस्क संशयित रुग्णांना विलगीकरण करण्यावर सर्वाधिक भर देण्यात येत आहे. किमान सात दिवस महापालिकेच्या वेगवेगळ्या कक्षामध्ये या रुग्णांना ठेवून तपासणी करण्यात येत आहे. सात दिवसांमध्ये त्यांच्यात काही लक्षणे आढळून आल्यास लाळेचे नमुने घेऊन तपासणी केली जात आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी मोहल्ला क्लीनिक संकल्पना राबविण्याचा महापालिकेचा विचार सुरू आहे. या कामासाठी खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. 

ज्या वसाहतीमध्ये खासगी डॉक्टर प्रॅक्टिस करीत आहेत. त्यांनी त्वरित रुग्णांना रेफर केल्यास त्यांचा जीव वाचवता येऊ शकतो. कोरोनाची लक्षणे दिसून येताच खासगी डॉक्टरांनी रुग्णाला त्वरित रेफर केले पाहिजे. अनेक रुग्ण दोन ते तीन ठिकाणी खासगी डॉक्टरांचे औषध उपचार घेऊन घाटीत दाखल होत आहेत. घाटीत आल्यानंतर प्रकृती अत्यंत खराब झालेली असते. त्यामुळे नागरिकांनी आणि खासगी डॉक्टरांनी थोडी तत्परता बाळगावी, जेने करून मृत्यूचे प्रमाण कमी होईल, असे नीता पाडळकर यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com