चांगली बातमी! आता पालकांची प्रतिक्षा संपणार, आरटीईची प्रक्रिया होणार सुरू

यंदा औरंगाबाद जिल्ह्यात ६०३ शाळांमध्ये ३ हजार ६२५ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे
rte
rterte

औरंगाबाद: कोरोनामुळे मागील चार महिने ब्रेक घेतलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून (ता. ११) सुरु होणार आहे. त्यामुळे आरटीईअंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना लवकरच शाळेत प्रवेश घेवून ऑनलाईन शिक्षण सुरु करता येईल. मागील वर्षाप्रमाणे यंदाही शाळा स्तरावर प्रवेश दिले जाणार आहेत.

यंदा औरंगाबाद जिल्ह्यात ६०३ शाळांमध्ये ३ हजार ६२५ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामध्ये पहिलीसाठी ३ हजार ६२१; तर प्रि प्रायमरीसाठी दोन शाळांमध्ये केवळ चार जागांची क्षमता आहे. पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ३० मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत सुमारे ११ हजार ८६१ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी कोणत्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संधी मिळणार यासाठी शिक्षण विभागामार्फत ऑनलाईन लकी ड्रॉ ची प्रक्रिया ७ एप्रिल रोजी पार पडली होती. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमधून ऑनलाईन लॉटरी पद्धतीने २ हजार ६४१ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती.

rte
PHOTOS: ईशान्य भारतातील सुंदर निसर्गाची सैर करा फोटोंमधून

जूनपासून सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू झाल्या असल्यातरी एसएससी बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. मात्र, बहुतेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवण्यास सुरुवात झाली आहे. परीणामी, आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविलेले अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले होते. शुक्रवारपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू होईल, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केले जात आहे.

इंग्रजी शाळांचा प्रवेशावर बहिष्कार-
मागील दोन वर्षाची प्रतिपूर्ती न मिळाल्यामुळे इंग्रजी शाळांनी आरटीई प्रवेशावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरटी प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल का? शिक्षण विभाग याबाबत काय भूमिक घेणार? मुलांच्या प्रवेशाचे काय होणार? अशी शंका पालकांकडून उपस्थित केली जात आहे

rte
पीक विम्यात देशात अव्वल ठरलेला 'बीड पॅटर्न' नेमका कसा होता?

दृष्टीक्षेप...
- निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी २० दिवसांचा कालावधी
- कोरोनामुळे पालकांनी शाळेत गर्दी टाळावी
- लॉटरी लागलेल्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रतिसह शाळेत पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्‍चित करावा
- शाळांनी पालकांना प्रवेशाकरिता पोर्टलवर दिनांक द्यावी
- निवड यादीतील प्रवेशाचा कालावधी संपल्यानंतर रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्राधान्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com