Sillod Tehsil : पावसाळ्यात जलसाठे तुडूंब, पण मार्चमध्येच गाठला तळ; पाणीटंचाईचे चटके बसणार

सिल्लोड पालोद खेळणा मध्यम प्रकल्पातून पाणी उपसा
पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडून जलसाठे तुडुंब भरले होते.
पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडून जलसाठे तुडुंब भरले होते. sakal

सिल्लोड : तालुक्यातील बहुतांश जलसाठ्यांमध्ये सद्याच्या परिस्थितीमध्ये अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध असून, पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडून जलसाठे तुडुंब भरले होते. परंतु आताची परिस्थिती बघितल्यास जलसाठ्यांमध्ये जेमतेम पाणीसाठा उपलब्ध असल्याचे चित्र आहे.

प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे येत्या उन्हाळ्यात अनेक गावांना पाणीटंचाईचे चटके बसणार असून दुसरीकडे पालोद-खेळणा मध्यम प्रकल्पातून अवैधरीत्या पाणी उपसा होत आहे.मात्र, याकडे प्रशासनाने काणाडोळा केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जलसाठ्यांच्या धरण क्षेत्रासह परिसरातील शेतकऱ्यांनी वारेमाप केलेला पाणीउपसा, संबंधित विभागांनी केलेला काणाडोळा यामुळे उन्हाळ्यामध्ये तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची परिस्थिती आहे.तर दुसरीकडे तालुक्यातील आसडी, अनाड, दिडगाव, मुखपाठ व धानोरा येथील ग्रामपंचायतींनी पंचायत समिती प्रशासनाकडे गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर

पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडून जलसाठे तुडुंब भरले होते.
Sambhaji nagar : महापालिका काढणार आदेश ; एसटीपीचे पाणी बांधकामासाठी योग्य

अधिग्रहण करण्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहे. तसेच डकला व धोत्रा ग्रामपंचायतींनी टॅंकरची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तालुक्यातील निम्म्या गावांना पाणीपुरवठा होत असलेल्या खेळणा मध्यम प्रकल्पात २७.८२ टक्के, अजिंठा-अंधारी मध्यम प्रकल्पात १८.७६ टक्के, केळगाव लघू तलावात २१.७३ टक्के, उंडणगाव लघू तलाव ७.९२ टक्के, रहिमाबाद लघू तलाव ८.२७ टक्के,

निल्लोड लघू पाझर तलाव २५.०८ टक्के, चारनेर लघू तलाव ३५ टक्के, हळदा-जळकी लघू तलाव १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सामना करताना नियोजन करणे आवश्यक असताना संबंधित विभाग मात्र ऐनवेळी करीत असलेल्या उपाययोजनांमुळे पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी पुरेसा पाणीसाठा असताना नियोजन करणे गरजेचे असताना ते होत नसल्याने पाण्याची समस्या निर्माण होत आहे.

पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडून जलसाठे तुडुंब भरले होते.
Pune News : ससूनच्या तिसऱ्या मजल्यावरून महिला डॉक्टरने मारली उडी; प्रकाराने खळबळ

धरणातून वारेमाप पाणीउपसा

धरण क्षेत्रातून होत असलेल्या अवैधरीत्या पाणीउपशाला आळा बसविणे गरजेचे आहे.परंतु असे होत नाही. धरणातून वारेमाप पाणी उपसा होत असून याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे धरणाचा पाणीसाठा दररोज कमी होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन विविध प्रकल्पातून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com