खरेदीकेंद्राकडून कापसाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्याची कृषीमंत्र्यांकडे इमेलद्वारे तक्रार

cotton
cotton

गेवराई(बीड): शासकीय कापूस खरेदी केंद्रावर घातलेल्या कापसाचे पैसे काही शेतकऱ्यांना अजूनही मिळाले नाहीत. त्यामुळे कापूस खरेदीचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी थेट कृषी मंत्र्याकडे इमेलद्वारे तक्रार केली आहे. सीसीआय कार्यालयात चकरा मरून व मागणी अनुसार कागदपत्रे देऊनही कापसाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. सीसीआय कार्यालय औरंगाबाद येथे कापसाचे पैसे तात्काळ जमा कराव्यात याचा ईमेल पाठवून ही कोणतेच उत्तर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांकडे तक्रार करून कापसाचे पैसे जमा करण्याची मागणी केली आहे.

तर शेतकऱ्यांचे पैसे जमा करण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाही करण्याची देखील मागणी केली आहे. गेवराई येथे भारतीय कपास निगम लिमिटेड (सीसीआय) यांच्या मार्फत शासकीय हमीभावाने कापूस खरेदी (ता.18)नोव्हेंबर2020 पासून चालू आहे. पहिल्याच दिवशी या खरेदी केंद्रावर रुख्मिनबाई काशिनाथ जाधव या नावे कापूस घातला होता. चार दिवसानंतर कापूस घातल्याची ताकपट्टी घेतली असता त्यावर आधार नंबर, कापसाचे वजन, वाहनाचा क्रमांक हे बरोबर आले होते.

तर संबंधित शेतकऱ्यांचे नाव, खाते नंबर, बँक आयएफएससी कोड चुकीचा आला होता. याची विचारपूस केली असता केंद्र प्रमुख मंगेश किटकुले यांनी हे ऑनलाईन करताना चुकले असून तुम्ही पूर्ण कागदपत्रे द्या पैसे मिळतील असे सांगितले. परंतु तीन महिने होत आले तरीपण पैसे खात्यावर जमा झाले नाहीत. संबंधित शेतकऱ्यांनी चार वेळेस गेवराई येथील कार्यालयात कागदपत्रे जमा केली आहेत परंतु अजूनही तेथील कर्मचारी कागदपत्राची मागणी करत आहेत.यामुळे शेतकऱ्यांचा मुलगा नवनाथ जाधव यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे इमेलव्दारे तक्रार केली असून तक्रारीत केली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की, मी व माझे भाऊ यांनी चार वेळेस कागदपत्रे दाखल करून तीन महिने झाले पैसे जमा झाले नाहीत. यामुळे मी सीसीआय कार्यालय औरंगाबाद यांना सात दिवस सात वेळेस इमेलव्दारे मागणी केली असता त्यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. यामुळे मी आपल्याकडे तक्रार करत असून तुम्ही कापसाचे पैसे तात्काळ जमा करण्याचे आदेश सबधितांना द्यावे तसेच तक्रारींचे उत्तर न देणाऱ्या आधिकऱ्यांना निलंबित करून उत्तर देणारे व वेळेस काम करणारे अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी कृषीमंत्री भुसे यांच्याकडे इमेलव्दारे केली आहे.

केंद्र प्रमुखांची शेतकऱ्यांना आरेरावीची भाषा-

गेवराई येथील सीसीआय कार्यालयात कापसाचे पैसे जमा झाले नाही अशी विचारपूस करण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना येथील केंद्र प्रमुख मंगेश किटकुले आरेरावीची भाषा वापरतात व कोठेही तक्रार केली तर आम्हाला काहीच फरक पडत नाही असे उत्तर देतात.

ऑनलाईन पोर्टलवर दिलेले फोन नंबर ही बंदच-

भारतीय कपास निगम लिमिटेत (सीसीआय) कार्यालय औरंगाबाद यांनी ऑनलाईन पोर्टलवर दिलेले फोन नंबर कधीही बंद असतात.घातलेल्या कापसाचे पैसे का आले नाही याची चौकशी करण्यासाठी फोन लावले असता फोन बंद असल्याचे दिसून येते.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com