बीड : कायदा सुव्यवस्थेचे सोडा; वाहतूक कोंडी सोडवा

मुख्य बाजारपेठा-रस्त्यांवर वाहनांच्या रांगा : वाहतूक कोंडीने बीडकर त्रस्त
Beed main market traffic jam
Beed main market traffic jam

बीड : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. पोलिस अधीक्षकांच्या बदलीनंतर काही बदल होईल, ही अपेक्षा आतापर्यंत तरी फोल आहे. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे जाऊ द्या, जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या शहरातील किमान वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी, या अपेक्षेवर आता बीडकरांनी हात टेकले आहेत. वाहतूक शाखा आहे का? असेल तर नेमके काय काम करते? असा सवाल शहरातील वाहतूक कोंडी पाहून पडतो.

सुभाष रोड, जालना रोड, टिळक रोड, बशीरगंज, नगर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी बाजारपेठांची आणि वर्दळीची ठिकाणे जणू वाहतूक कोंडी केंद्र झाली आहेत. विशेष म्हणजे शहर वाहतूक शाखेचे केंद्र असलेल्या बसस्थानकासमोरही वाहनांच्या रांगा लागत असताना नेमक्या उपाय योजना काय? असा सवाल उपस्थित होत आहे. सणवारांच्या दिवसांत खरेदीदारांची गर्दी आणि बाजारपेठांत दुकानांसमोर आडवी-तिडवी वाहने लावलेली असतानाही कारवाया होत नाहीत. आताही तसेच चित्र आहे.

नेमके कारवाया करताना अशाच ठिकाणी वाहतूक पोलिसांचा हात का आखडतो? असा प्रश्न आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून अधूनमधून पावसाच्या सरी येतात आणि दुचाकीस्वारांना वाहतूक कोंडीत अडकून पावसात भिजावे लागते. ज्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक असल्याचे सांगितले जात आहे अशाच ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यात सुभाष रोड, भाजी मंडई कॉर्नर, शहर पोलिस ठाणे कॉर्नर वाहतूक कोंडीच्या समस्येत कायम फसलेला असतो. एकीकडे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत होण्याची अपेक्षा असताना दुसरीकडे बीडकरांना भलत्याच समस्येचा सामना करावा लागत आहे.

सुभाष रोड, जालना रोड, टिळक रोड, बशीरगंज, नगर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी बाजारपेठांची आणि वर्दळीची ठिकाणे जणू वाहतूक कोंडी केंद्र झाली आहेत. विशेष म्हणजे शहर वाहतूक शाखेचे केंद्र असलेल्या बसस्थानकासमोरही वाहनांच्या रांगा लागत असताना नेमक्या उपाय योजना काय? असा सवाल उपस्थित होत आहे. सणवारांच्या दिवसांत खरेदीदारांची गर्दी आणि बाजारपेठांत दुकानांसमोर आडवी-तिडवी वाहने लावलेली असतानाही कारवाया होत नाहीत. आताही तसेच चित्र आहे.

नेमके कारवाया करताना अशाच ठिकाणी वाहतूक पोलिसांचा हात का आखडतो? असा प्रश्न आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून अधूनमधून पावसाच्या सरी येतात आणि दुचाकीस्वारांना वाहतूक कोंडीत अडकून पावसात भिजावे लागते. ज्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक असल्याचे सांगितले जात आहे अशाच ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यात सुभाष रोड, भाजी मंडई कॉर्नर, शहर पोलिस ठाणे कॉर्नर वाहतूक कोंडीच्या समस्येत कायम फसलेला असतो. एकीकडे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत होण्याची अपेक्षा असताना दुसरीकडे बीडकरांना भलत्याच समस्येचा सामना करावा लागत आहे.

फक्त खेडूतांवर कारवाया का?

वाहतूक पोलिसांकडून दंडाच्या कारवाया करताना शहरी मंडळी ट्रिपल सिट, नको तसे कर्णकर्कश हॉर्न, नियमात नसलेल्या नंबर प्लेटच्या दुचाकी, काळ्या काचांची वाहने घेऊन जात असताना वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचे कारवायांसाठी हात बांधलेली असतात. परंतु, खेडूत चेहरा असलेला दुचाकीस्वार किंवा भाविकांची वाहने अडवून मात्र कारवाया करून दंड वसूल करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com