बीड - श्रीक्षेत्र भगवानगडावर दसरा मेळावा घेण्याची परंपरा संत भगवान बाबांच्या काळात सुरू केली गेली होती. ही परंपरा खंडित करण्याचा अधिकार नामदेव शास्त्रींना आहे का? असा संतप्त सवाल पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी उपस्थित केला आहे.
महंत नामदेव शास्त्रींना उपरोधिकपणे "बाबा राम-रहीम' असे संबोधत राज्यात भाजपची सत्ता असल्याने भगवानगडाची विश्वस्त समिती रद्द करून सरकारने गड स्वतःच्या नियंत्रणाखाली घ्यावा, अशी मागणी समर्थकांनी केली. एवढेच नाही तर दसरा मेळावा भगवानगडावरच होणार असल्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर दसरा मेळावा व्हावा, ही लोकभावना असल्याचे सांगून शास्त्रींना मेळाव्यास परवानगी द्यावी, अशी विनवणी पत्राद्वारे बुधवारी (ता.27) केली होती. मात्र त्यानंतर "भगवानगडावर राजकीय भाष्य नाही', अशी नामदेवशास्त्री यांनी घेतलेली भूमिका या पार्श्वभूमीवर तापलेल्या वातावरणात गुरुवारी बीडमध्ये पंकजा मुंडे समर्थकांची बैठक पार पडली.
|