राज्यात कोणताच वर्ग समाधानी नाही: अजित पवार

राज्यात कोणताच वर्ग समाधानी नाही: अजित पवार
राज्यात कोणताच वर्ग समाधानी नाही: अजित पवार

आष्टी (बीड): शेतकरी, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, बस वाहक-चालक अशा सर्वच घटकांच्या मुळावर हे सरकार उठले आहे. कोणताच घटक राज्यात समाधानी नाही. शेती मालाला दोन हजार रुपये क्विंटल भाव आणि जनावरांची पेंड चार हजार रुपये क्विंटल असल्यास शेतकरी कसा जगेल, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

भाजपचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब आजबे यांचा सोमवारी (ता. १३) राष्ट्रवादीत प्रवेश झाला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडित, उषा दराडे, राजेंद्र जगताप यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते. यावेळी श्री. पवार म्हणाले, दिवंगत लोकनेते वसंतदादा पाटील व शरद पवारांनी नेहमी शेतकरी हिताचे निर्णय घेतले. मात्र, आता शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मंत्रालयावर चढत आहे. तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांना २४ तास वीज देण्याची घोषणा होते आणि महाराष्ट्रात वीज जोडण्याच्या सुचना देतात. वीजच दिली जात नाही तर बील कसे भरणार असा सवाल अजित पवार यांनी केला. विरोधी पक्षात असताना कापासाला १० हजार रुपये क्विंटल भाव मागता आणि आता चार हजार रुपयांनी भाव देता. या सरकारची बनवाबनवी चालली असल्याची टिका त्यांनी केली. यावेळी त्यांनी माजी मंत्री सुरेश धस यांच्यावरही जोरदार टिका केली.

५४ वर्षाच्या कर्जात तीन वर्षांत दीड पट वाढ
मागच्या ५४ वर्षांमध्ये महाराष्ट्रावर २.९३ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. आम्ही राज्य कर्जात नेल्याची ओरड करणाऱ्या भाजप सरकारने मागच्या तीन वर्षात या कर्जात तब्बल दीड पट वाढ केल्याचा आरोप केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com