पराभव दिसू लागल्यानेच काँग्रेसकडून ईव्हीएमसंदर्भात आरोप: दानवे

danve
danve

जालना, ता.28: येत्या लोकसभा निवडणुकीत विरोधाकांना पराभव दिसत आहेत, त्यामुळेच सर्व विरोधक एकत्र येऊन लागले आहेत. मात्र 2019 मध्ये ही भाजपची सत्ता येणार असून  नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री होतील, असे भाजप प्रदेशाध्यक्षक रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीस सोमवारी (ता. 28) जालना शहरातील कलस सीड्स येथे सुरवात झाली आहे. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रदेशप्रभारी डॉ. सरोज पांडे, केंद्रीय सहसंघटक व्ही सतीश, मुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे, चंद्रकांत पाटील, बबनराव लोणीकर, विनोद तावडे, पंकजा पालवे, सुभाष देशमुख,एकनाथ खडसे, यांच्यासह भाजपचे मंत्री, पदाधिकारी, प्रदेश समिती सदस्यांची उपस्थित होतो.

या वेळी भाजप प्रदेशाध्यक्षक रावसाहेब दानवे म्हणाले, की भाजपने राज्यातील 27 पैकी 18 महानगरपालिका काबिज केल्या आहेत.  काँग्रेस सरकारने  मराठा आरक्षण दिले नाही. मात्र भाजप सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा करुण मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले आहे, असे ही दानवे यांनी म्हटले.  तसेच केंद्र शासनाने विविध योजना राबवून हे गरीबांच्या हिताचे निर्यात घेतले. जन धन योजनेच्या मध्यमातुम बँकेत 31 कोटी खाते उघडले आहेत. त्यामुळे  सर्व योजनेच्या लाभ थेट लाभर्थ्यांच्या बँके खात्यात जमा होत आहे. विरोधक इव्हीएम मशीन मध्ये घोटाळा केल्याचा आरोप करीत आहेत. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसची सत्ता होती. ईव्हीएम मशीन त्यांच्या  ताब्यात होत्या. मग आम्ही कसा घोटाळा केला असा सवाल ही विचारत मोदी यांना घाबरून आणि पराभव समोरा दिसू लागल्याने सर्व विरोधक एकत्र आले आहेत, असे ही दानवे यांनी म्हटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com