जालना - जिल्ह्यात परजिल्ह्यातील व परराज्यातील मजुरांसाठी ४२ कॅम्प सुरू करण्यास आले आहे. या कॅम्पमधील दोन हजार ७५४ स्थलांतरित मजुरांची शासन व सामाजिक संस्थांच्या वतीने दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू केल्यानंतर सर्व कंपन्यांसह सर्व काम ठप्प झाले आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नसल्याने हे मजूर घराकडे निघाले आहेत. त्यामुळे रस्त्यांनी अनेक मजूर आपल्या कुटुंबासह पायी आपल्या घराकडे जात असल्याचे चित्र आहे. मात्र, या स्थलांतरित परजिल्ह्यातील व परराज्यातील मजुरांनी आहे त्याच ठिकाणी थांबण्याचे आवाहन शासनाने केले आहे.
हेही वाचा : जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट
त्याच अनुषंगाने जिल्हापातळीवर या स्थलांतरित मजुरांच्या राहण्यासह जेवणाची व्यवस्था करण्याचे सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहे. त्यानुसार जालना जिल्ह्यात ४२ ठिकाणी स्थलांतरित मजुरांसाठी कॅम्प सुरू करण्यात आले आहेत.
हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद
या ४२ कॅम्पमध्ये आजघडीला सुमारे दोन हजार ७५४ स्थलांतरित मजुरांची व्यवस्था करण्यात आली. या मजुरांच्या दोनवेळच्या जेवणाची व वैद्यकीय सेवा जिल्हा प्रशासनाने सामाजिक संस्थांसह व्यवस्था केली आहे; तसेच श्रीदत्त आश्रमाच्या वतीने सकाळी चार हजार व संध्याकाळी चार हजार लोकांना अन्नपदार्थांची पाकिटे देण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले. तसेच परजिल्ह्यात व परराज्यातील मजूर जर स्थलांतरित होत असतील तर त्यांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.