सावधान... साचलेल्या पाण्यात डेंगींचे डास

das
das

परभणी : शहरात सर्वत्र रस्त्यावर भंगार साहित्य, टायर्स, भंगार वाहने पडल्याने त्याचा नागरिकांच्या आराेग्यावर परिणाम हाेत असल्याचे दिसून येते. यातील अनेक प्रकारच्या भंगारात पाणी साचल्यामुळे मोठ्याप्रमाणात डासांची उत्पत्ती होत असल्याने परभणीतील नागरिकांनी फिरताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा डेंगीची लागण हाेऊ शकते.

महापालिकेने अशा भंगार साहित्यातही डासअळ्यांची शोध मोहिम हाती घेऊन डासांची उत्पत्ती रोखण्याचे प्रयत्न चालवले असले तरी नागरिकांची काळजी काही कमी हाेत नसल्याचे पहावयास मिळते.  

शहरात मोठ्या प्रमाणात तापीचे रूग्ण आढळून येत असून सरकारी, खासगी दवाखान्यात व्हायरल फिव्हरने अनेक लोक त्रस्त आहेत. त्यातच जिल्ह्यात डेंगूचे १९ रूग्ण आढळून आले, त्यापैकी ११ शहरात असल्यामुळे डेंगूची गंभीरता अधिक वाढली आहे. शहरात सर्वत्र डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गटारे, पाण्याची डबकी जशी त्यासाठी कारणीभूत आहेत. त्यापेक्षा अधिक रस्त्यावर, गॅरेजमध्ये, दुकानांमध्ये पडलेले भंगार साहित्य देखील तेव्हढेच कारणीभूत आहेत. उघड्यावर असलेल्या या टायर, वाहने, प्लाॅस्टीक, लोखंडी टाक्यांसह विविध प्रकारच्या साहित्यात पाणी साठल्यामुळे देखील ते डासअळ्यांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरू लागली आहेत. नुकतेच पालिकेच्या मलेरिया विभागाने अशास रस्त्यावर थप्पी लावलेल्या टायरमध्ये साचलेल्या पाण्याची तपासणी केली असता, त्यामध्ये डासअळ्या आढळून आल्या. त्यामुळे शहरात रस्त्यावर, गोदाम परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य उघडे पडलेले आहे, की पालिकेने त्यासाठी सर्वच्या सर्वच कर्मचारी कामाला लावले तरी ते कमीच पडणार आहेत.

नागरिकांमध्येच जनजागृतीची अधिक गरज
रोग-उपचारापेक्षा प्रतिबंध बरा, असे म्हटल्या जाते. परंतु नागरिकांमध्ये अजुनही जनजागृतीचा आजार आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी काही नागरिक कोरडा दिवस पाळू लागले, आपला परिसर स्वच्छ ठेवू लागले. परंतु सर्वांनी या मध्ये सहभाग घेतल्याशिवाय ते शक्य नाही. शहरात रस्त्यावर अनेक बंद पडलेली वाहने दिसून येतात. गॅरेजचे भंगार साहित्य देखील रस्त्यावरच ठेवले जाते. नाल्या उघड्या आहेत, अनेक भागात नाल्या नसल्यामुळे पाण्याची डबकी साचली आहेत. त्यामुळे या प्रत्येक क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज असून नागरिकांबरोबर पालिकेने देखील त्याकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे

महापालिकेने या बाबी कराव्यात 
-रस्त्यावरील भंगार साहित्य, संबंधीतास सक्तीने स्वतःच्या जागेत ठेवण्यास परावृत्त करावे.
-रस्त्यावरील भंगार वाहने जप्त करून त्यांचा लिलाव करावा. 
-काही सक्तीची कारवाई सुरू केल्याशिवाय या बाबी आटोक्यात येणार नाहीत.
-भूमिगत गटार योजनेसाठी पाठपुरावा करावा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com