नाव आंतरराष्ट्रीय; मात्र देशांतर्गतही विस्तार नाही

Airport
Airport

औरंगाबाद - येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी सज्ज झालेले आहे; मात्र येथे जगप्रसिद्ध अजिंठा, वेरुळ लेण्यांसह पयर्टनस्थळांची रेलचेल असतानाही या विमानतळावरून देशांतर्गत सेवेचाही विस्तार होत नाही. 

चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टी अद्ययावतीकरणाचे काम गेल्या वर्षी करण्यात आले. ५५७ एकरांच्या विस्तीर्ण परिसरात असलेल्या चिकलठाणा विमानतळाची तब्बल २.२७ किलोमीटर अंतराची धावपट्टी आहे. येत्या तीस-चाळीस वर्षांची गरज लक्षात घेऊन विमानतळाचे विस्तारीकरण केलेले आहे. दिवसभरात साधारण वीस ते तीस विमाने उड्डाण करू शकतील, अशी व्यवस्था विमानतळ प्राधिकरणाने केली आहे. सध्या चिकलठाणा विमानतळावरून हजला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी जेद्दासाठी थेट विमानाचे उड्डाण होते; तर देशांतर्गत इंडियन एअरलाइन्स, ट्रूजेट आणि जेट एअरवेज या केवळ तीन कंपन्यांची मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद अशी सेवा आहे. अनेक विमान कंपन्या सेवेसाठी इच्छुक आहेत; मात्र त्यांना मुंबईत स्लॉट मिळत नाही, ही सर्वांत मोठी अडचण आहे. जगप्रसिद्ध वेरुळ आणि अजिंठा लेणी पाहण्यासाठी विदेशी पर्यटक थेट औरंगाबादेत येऊ शकतात; मात्र तशी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होत नाही. देशांतर्गत मुंबई व दिल्लीलाही नवीन विमानसेवा सुरू होत नाही, त्यासाठी राजकीय आणि औद्योगिक क्षेत्राकडून पाहिजे तसा पाठपुरावा होत नाही.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
औरंगाबादहून रोज रेल्वे, खासगी वाहनांनी मुंबई, पुणे, नाशिकला जाणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात जाते. त्याचप्रमाणे नागपूरसाठीही प्रवासी वर्ग आहे. यातील मोठा प्रवासी वर्ग नाइलाजाने विमानसेवा नसल्याने रस्ता मार्गाचा अवलंब करतो. राजकीय नेतृत्वाचा पाठपुरावा नसल्यानेच येथील विमानसेवेला चालना मिळत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com