गटामार्फत कृषी निविष्ठांची सामूहिक खरेदी करा, कोरोना टाळा...

biyane
biyane

हिंगोली ः शेतकऱ्यांनी खरीप हंगामात बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक खरेदी करताना गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच ती खरेदी करावीत. शेतकऱ्यांनी शक्‍यतो कृषी निविष्ठांच्या वैयक्‍तिक खरेदीपेक्षा गटामार्फत सामूहिक कृषी निविष्ठाच्या खरेदीला प्राधान्य द्यावे जेणेकरून कृषी सेवा केंद्रावर गर्दी होणार नाही व कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रसार कमी होण्यास मदत होईल तसेच गटामार्फत सामुहिक खरेदी केल्याने वाहतूक खर्चात बचत होईल, असे आवाहन जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी व जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोंखडे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी बनावट, भेसळयुक्‍त बियाणे, खते, किटकनाशके टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडूनच त्‍याची खरेदी करावी. पावतीवर शेतकऱ्याची व विक्रेत्याची स्‍वाक्षरी व मोबाईल नंबरची नोंद करून घ्यावी, पिक निघेपर्यंत ती पावती सांभाळुन ठेवावी, खरेदी केलेल्या बियाणाचे वेस्‍टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्‍यातील थोडे बियाणे, कापनी होईपर्यंत जपून ठेवावे, भेसळीची शंका दुर करण्यासाठी बियाण्यांची पाकिटे शिलबंद असल्याची खात्री करून घ्यावी, बियाणे उगवण्याच्या खात्रीसाठी पॉकिटावरची अंतिम मुदत तपासावी, कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा अधिक किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी अधिकारी कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा.

टोल फ्री नंबरवर संपर्क करावा
किटकनाशके अंतिम मुदतीचे आतील असल्याची खात्री करावी, आपल्या तक्रारीविषयी माहिती प्रत्‍यक्ष, दुरध्वनी ई-मेल, एसएमएस, इत्यादीद्वारे देऊन शासनाच्या गतीमान गुणनियंत्रक अभियानात सहभागी व्हा, कृषी निविष्ठाविषयी असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच मार्गदर्शनासाठी कृषी विभागाच्या या १८००२३३४००० टोल फ्री नंबरवर संपर्क करावा. 

बियाणे न उगवल्याची लेखी तक्रार कळवावी
शेतकऱ्यांनी बियाणे न उगवल्याची लेखी तक्रार तत्‍काळ कृषी अधिकारी कार्यालयास कळवावी. शेतकऱ्याच्या या संबधी तक्रारीचे निवारण करण्यासाठी कृषी विभागामार्फत जिल्‍हास्‍तरावर एक व तालुकास्‍तरावर पाच अशा एकूण सहा तक्रार निवारण समित्यांची स्‍थापना करण्यात आलेली आहे.

भरारी पथकाकडे संपर्क साधावा
शेतकऱ्यांनी शक्‍यतो कृषी निविष्ठांच्या वैयक्‍तिक खरेदीपेक्षा गटामार्फत सामूहिक कृषी निविष्ठाच्या खरेदीला प्राधान्य द्यावे जेणेकरून कृषी सेवा केंद्रावर गर्दी होणार नाही व कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रसार कमी होण्यास मदत होईल तसेच गटामार्फत सामुहिक खरेदी केल्याने वाहतूक खर्चात बचत होईल. जिल्‍ह्यातील प्रत्‍येक कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर भरारी पथकाकडे संपर्क साधावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्‍हाअधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, कृषी विकास अधिकारी एन. आर. कानवडे यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com