कॉंग्रेसप्रमाणे राष्ट्रवादीचेही अस्तित्व राज्यात संपणार - येडीयुरप्पा

उदगीर : डॉ. अनिल कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांचे भाषण झाले. यावेळी मंत्री प्रभू चव्हाण, बिदरचे खासदार भगवंत खुब्बा, खासदार सुधाकर शृंगारे, नागनाथ निडवदे, गोविंदराव केंद्रे, रामचंद्र तिरुके.
उदगीर : डॉ. अनिल कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांचे भाषण झाले. यावेळी मंत्री प्रभू चव्हाण, बिदरचे खासदार भगवंत खुब्बा, खासदार सुधाकर शृंगारे, नागनाथ निडवदे, गोविंदराव केंद्रे, रामचंद्र तिरुके.

उदगीर( जि. लातूर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसमुक्त भारताची संकल्पना राबवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता कॉंग्रेसबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अस्तित्व संपवणार आहेत. त्यामुळे यांच्या भानगडीत कोणीही न पडता विकासासाठी भाजपच्या डॉ. अनिल कांबळे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी केले आहे. 


गुरुवारी (ता. 17) येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर भाजपा-सेना महायुतीचे उमेदवार डॉ. अनिल कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर कर्नाटकचे मंत्री प्रभू चव्हाण, बिदरचे खासदार भगवंत खुब्बा, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, भाजपा जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. 


येदियुरप्पा म्हणाले की, केंद्रात दहा वर्षे आणि राज्यात पंधरा वर्षे सत्ता असूनही कॉंग्रेस आघाडीने विकासकामे केली नाहीत. गेल्या पाच वर्षांत भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विकासाची कामे सुरू केली आहेत. नदीजोड प्रकल्पाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करून अखंड भारत निर्माण केला आहे. त्यांच्या या निर्णयाचे देशवासीयांनी स्वागत केले आहे. 


महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या मागण्या मान्य करण्याची शिफारस आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी सांगितले. तर डॉ. अनिल कांबळे यांना 25 हजारांच्या मताधिक्‍याने विजयी करण्याचे आवाहन येदियुरप्पा यांनी केले. 


यावेळी डॉ. कांबळे म्हणाले की, मागच्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना आणलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये राज्यात सात लाख बेघरांना घरे मिळालेली आहेत. तर आणखी तीन लाख बेघरांना घरे देण्यात येणार आहेत. राज्यात सहा हजार किलोमीटर अंतराचे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. दुर्धर आजाराने आजारी असलेल्या रुग्णांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत खर्च सरकारकडून करण्यात येत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com