भाजप सरकार म्हणजे घोषणांचा कारखाना : अशोक चव्हाण 

Ashok Chavan
Ashok Chavan

अंबाजोगाई : साडेचार वर्षांच्या काळात या भाजप सरकारने फक्त घोषणाच करण्याचे काम केले. सर्व सामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळालाच नाही, त्यामुळे हे सरकार म्हणजे घोषणांचा कारखाना असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता. एक) येथे केली.

काँग्रेसची तिसऱ्या टप्यातील जनसंघर्ष यात्रा गुरुवारी येथे पोचली. त्यानिमित्त येथे झालेल्या सभेत चव्हाण बोलत होते. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारीणीच्या कायम निमंत्रीत सदस्या रजनी पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अशोकराव पाटील, सुरेश नवले, प्रा. टि. पी. मुंडे, जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, राजेसाहेब देशमुख, अंजली घाडगे, नगराध्यक्षा रचना मोदी, केजचे आदित्य पाटील उपस्थिते होते.

चव्हाण म्हणाले, सरकारचे जनसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. राज्यभर गंभीर दुष्काळ असताना तर बीडच्या पालकमंत्री परदेश दौऱ्यावर जातात. जिल्हा दुष्काळ सदृष्य अन् पालकमंत्री अदृष्य असा टोलाही त्यांनी लगावला. या सरकारचे मंत्री दुष्काळाची पाहणी मोबाईलच्या प्रकाशात करतात. काय चाललय हे असा प्रश्न करून यांचे मंत्री दुष्काळ नव्हे तर उमेदवाराची चाचपणी करायला निघतात, अशी टीकाही त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com